Tuesday, 14 November 2017

रिध्दपुर महात्म्य...




                          रिद्धपुर महात्म्य 
                          """""""""""""""""""""

रिध्दपुरी नांदे प्रभू अवतार भजन तथा रिध्दपुर स्थानदर्शन पाहण्यासाठी येथे टच करा..

                     

          महानुभावांच्या सात काव्यापैकी रिद्धपुर वर्णन नावाचे एक महाकाव्य आहे. याच काव्याच्या पार्श्वभूमीवर आधारभूत मयंकराज शिष्य कवी डिंभ कृष्णमुनी यांनी रिद्धपुरचे महात्म्य सांगणारा रिद्धपुर महात्म्य  नावाचा ग्रंथ लिहिला. महात्म्य या शब्दावरुनच रिद्धपुरचे श्रेष्ठत्व आणि महानत्व याची कल्पना येते.
           या ठिकाणी रिद्धपुर महात्म्यातिल काही रोचक असा भाग सादर करीत आहे. पंडीत भिष्माचार्यांच्या आदेशावरुन कवी डिंभ यांनी भिष्माचार्यकृत सिद्धयामळ या संस्कृत ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला आहे़.

भिष्माचार्य म्हणे कवी डिंभा कृष्णमुनी ।
तेथे रिद्धपुर महात्म्य असे संस्कृतवाणी ।
तयाची मराठी भाषा करुणी ।
कथा निर्मावी तुवा ।।

तेंव्हा कवी डिंभ म्हणतात....

तयाची ये आज्ञेकिरीता । आरंभ केला ग्रंथा ।
तो आईकावा श्रोता आदरेसी ।

अशा प्रकारची सुचना श्रोत्यांना करुन कवी डिंभ आपल्या ग्रंथात परमेश्वरपुराचा महिमा वर्णन करीत आहे.

           * * * * * *
सांगता रिद्धपुर महात्म्य कथा ।
तिन आख्यान असे सर्वथा ।
नृसिंह ब्रह्महत्येपासोनि तत्वता ।
मुक्त झाला रिद्धपुरी ।।१४३।।

आनी रुचीक कथा श्रेष्ठा ।
दत्तात्रेय देवे केली रेणुकेंची प्रतिष्ठा ।
ऐसी तीन आख्याने निष्टा ।
असेती तेथे ।।४४।।

कळंयुगी अवतरौणीक भगवंते ।
द्वारका दाखविली लक्ष्मींदर द्विजाते ।
म्हणौनि द्वारावती रिद्धपुराते ।
म्हणिजे जाणा ।।१४९।।

रिद्धपुरा प्रयाण करता ।
तुज महिमा सांगैन असिता ।
सहस्र यज्ञाचे फळ तत्वता ।
लाभे  येकेके  पाउली ।।१५०।।

जे उत्तम मतीचे जन ।
रिद्धपुरा करती गमन ।
ते सतकोटी कुळासहित जान ।
पावती अच्यूतपद ।।१५१।।
जे रिद्धपुरा जावों म्हणती ।
ऐसी जयाची मनोवृती ।
तयाची पापे विलया जाती ।
जन्मोजन्मीची ।।१५२।।

जे रिद्धपुरा प्राणी जाती ।
श्रीप्रभू सन्निधानी मृत्ये  पावती ।
तया नाही पुनरावृत्ती ।
कल्पकाळवेऱ्हीं ।।१५३।।

जवे पर्यंत रिद्धपुरासी ।
गमन न कीजे पुरुषी ।
तवे पर्यंत पापाचिया रासी ।
न वचेती तयाचिया ।।१५४।।

अनंता पुण्यसंख्या तिर्थाचीया ।
दानाध्ययेन येज्ञाचिया ।
ब्रह्मेनि पुर्वी वीहिलिया जीया ।
तोया होती येके रिद्धपुरे ।।१५५।।

तप शौच्य दानाध्ययेन ।
वृताचे कैसे कारण ।
रिद्धपुरा केल्या गमण ।
त्याचा आत्मा शुद्ध होये ।।१५६।।

वाराणसी नर्मदादी कुरुक्षेत्रे ।
इत्यादी तिर्थे सर्वत्र केलीया ।
जे फळ होती निमिश मात्रे ।
जे जोडती रिद्धपुरी ।।१५७।।

तवेपर्यंत कासी आवंती मायानगरी ।
तीर्थेतीर्थपणे वाखानाति पृथिववरी।
जवे नाही देखिली रिद्धपुरी ।
सर्व पापनाशनी ।।१५८।।

जो बुद्धी धरुणि मानसी ।
नमस्कारी  रिद्धपुरासी ।
तेने मातेचिये प्रसन्न-वेदनेसी ।
नसिले सत्ये ।।१५९।।

जो घरी असौनि मानसी ।
नित्ये चींती रिद्धपुरा जावयाची ।
कींचीत पाप न बधी तयासी ।
म्हणे रुषीराज ।।१६०।।

परमेश्वरपुर  देखिलेयी दृष्टी ।
छत्र स्वपादुका परित्यजोनि राजश्रेष्ठी ।
साष्टांग घालीजे भुतटी ।
तरी होये पापाक्षेयो ।।१६१।।
सहस्र जन्मांतरे कासी स्थळ ।
सेविलीया जे  होये पुन्यफळ ।
ते रिद्धपुर सेविता केवळ ।
होये पाचा  दिवसा  ।।१६२।।

परमेश्वरपुरी जरी ।
स्वएंव वास करी ।
तो गति पांवे नीर्धारी ।
कुळी योगीयांचा ।।१६३।।

जावया रिद्धपुराप्रती ।
जे जन वासना धरची ।
ते नरकापासौनि मुक्त होती ।
पीतरासहीत ।।१६४।।

जो रिद्धपुरासी जाये ।
पदोपदी अश्वमेघ फळ लाहे ।
जो आनिका पाठवी तयासी होये ।
अच्युतपद ।।१६५।।

शत  येक चंद्रग्रहणी ।
शोमनाथी फळ लाहिजे जनी ।
ते फळ होय प्रतिदिनी ।
सेविलीया रिद्धपुरा ।।१६६।।

सहस्रवार कृष्णपक्षीचे ।
व्रतयुक्त केलया फळ तयांचे ।
ते येके दीवसें लाहिजे साचें ।
रिद्दीपुर स्थाने ।।१६७।।

पुष्कर तीर्थी कोटी कार्तिकी ।
केलिया जे फळ लाहिजे लोकी ।
ते रिद्धपुर केलया येकी ।
लाहिजे सीघ्र ।।१६८।।

शुक्लपक्षी चैत्रमासी ।
जो रिद्धपुरा जाये चतुर्दशी ।
ब्रह्मपद होये तयासी ।
संसयो नाही ।।१६९।।

रिद्धपुरा यात्रेसी ।
जो भोजन दे ज्ञातृभीक्षुसी ।
संसार - यातना तयासी ।
बाधुं न शके ।।१७०।।

हे रिद्धपुर महात्म्य प्रतक्ष ।
मनन केलिया पाविजे मोक्ष ।
वाचिता लाहिजे सीक्ष ।
परज्ञानाचा ।।१७१।।

हे अज्ञाना पुरुषासी ।
असत्य वाटे मानसी ।
जैसे गर्भावळे पदार्थासी ।
न दे कदा ।।१७२।।

वस्ति केलिया तिये रिद्धपुर स्थानी ।
नृसिंह मुक्त झाला पापापासौनी ।
यैसे नीरोपीता जाला शुळपानी ।
गौतमाप्रती ।।१७३।।

नृसिंहे जेथे केली वस्ती ।
तेथे नृसिंहमठ केला नीगुती ।
तयासी राजमठ म्हणती ।
कळयुगी मुनीजन ।।२३७।।

आठा दीशा अष्टजैया ।
येउनी सीमांतरी राहिलीया ।
समंधसुख लाहावया ।
श्रीप्रभूंचे ।।२५०।।

ब्रह्मेनी  नीरुपीले नृसिंहाप्रती ।
तुवा रिध्दपुरा करावी वस्ती ।
जवे अवतरे कैवल्यपती ।
कळयुगी ।।२५१।।

भस्मापुराचेया भयापासुनी ।
नारायेणे मज मुक्त केले वंकतीर्थस्थानी ।
तैसा नृसिंह रिद्धिपुर पाटनी ।
श्रीप्रभूने मुक्त केला ।।२५७।।

ऐसे रिद्धिपुर पवित्र रम्ये तीर्थ ।
अज्ञान जन वास करिती तेथे ।
ते स्वर्गात पावती निभ्रांत ।
संशयो नाही ।।२५८।।

मां जे का ब्रह्मज्ञानी असती ।
रिद्धपुर नमस्करुणी श्रीप्रभूतें चिंतीती ।
ते कैवल्यपद पावती।
नवल गाढे ।।२५९।।

म्हणौनि याचेनि दर्शनी ।
नृसिंहे रिध्दपुरे वस्ती केली असे ।
आछादन रुपे पाषाण वेशे।
सकळ देवांसहित ।।२७०।।
 
तेथे परमेश्वर अवतरैल ।
आनचचिया प्रतिमासी खेळ करैल ।
तेने आम्हा आवंदानुभव होईल ।
जो नाही आमच्या स्वरुपी ।

ऐसे कल्पुनि अंतरी ।
सकळ देव असती रिध्दपुरी ।
कळयुगी सुखशांति पावावया सुंदरी ।
असे रिद्धपुर ।।२७२।।

अवतारोणि तियाचे उदरी ।
श्रीगुंडमनाम स्विकरी ।
जन्मकाळी सुरवरी ।
केला पुृ्ष्पर्शावो ।।६००।।

वृतबंध जालेयावरी ।
वास्तव्ये केले रिद्धपुरी ।
बाळक्रिडा पकोपरी ।
खेळता जाला ।।६०१।।

जया कृमीवरि श्रीचरण ठेवी ।
तयासि नेउनी ब्रह्मपदी बैसवी ।
मेली प्रेते जीववी ।
श्री प्रभु तो ।।६०२।।

तया रिद्धिपुराचिया महिमाना ।
न वर्णवे रुषी सुरगणा ।
शेषा वर्णिता रसना ।
जालिया दोन भाग ।।७०५।।

यैसे रिद्धिपुर महात्म्य कथा ।
देवल म्हणे रुषिनाथा ।
महेष जाला सांगता ।
गौतमाप्रती ।।७०६।।

ऐसा देवला असिताचा संवाद ।
रिद्धिपुर महात्म्य कथेचा अनुवाद ।
तो करुणिया विशद ।
सांगितला तूज ।।७११।।

कथा संपूर्ण जाली येथौनि ।
कवी मुनिजना विनवी कर जोडौनी ।
अन्य कथनाची खंति मनी ।
काहि न धरावी ।।७१२।।

मज अस्तीपरीचा आचार नाही ।
भजन पुजन द्रव्य न जोडे कांही ।
म्हणौनि नामस्मरण करी पाही ।।
ग्रंथरचनामीशे ।।७१३।।

हे रिद्धिपुर महात्म्य श्रवण केलिया ।
परलाभ जोडे श्रोतया ।
श्रीप्रभूचरणा चरणार्विदी मुनि कृष्णया ।
लीन सर्व काळी ।।७१४।।

      ❇❇❇❇❇

अशा प्रकारे कवि डिंभ यांनी श्रीक्षेत्र रिध्दपुरचे महत्व अगदी साध्या व सोप्या भाषेत वर्णन केले आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Wednesday, 8 November 2017

श्री चक्रधर स्वामींची लिळा - डोडविहीरां [डोढ्रा जि. बुलडाणा] राघवदेवा भेटी

डोडविहीरां [डोढ्रा जि. बुलडाणा] राघवदेवा भेटी:
~~~~~~~~~~~~~~

लीळा :

           पूर्वि राघवभट्टांना भोगनारायणी गोसावियांची भेट झाली होती. परिभ्रमणाच्या पुर्वार्धात आमचे सर्वज्ञ शेंदुर्जनहून डोढ्रा येथे आले. गावाच्या उत्तरेस असलेल्या पिंपळाखाली खडक होता येथे आसन झाले. [ छायाचित्रातील मंदिराच्या ठिकाणी ] राघवभट्टांना तेंव्हा हे काल तेंव्हा त्यांना महाउत्सव केला. घरोघरी सडासामार्जन केले, दारासमोर रांगोळी काढल्या, गुढ्यातोरणे उभारली, पुजा सामुग्री व नानाविध पुजाद्रव्य घेउन वाजतगाजत, नाचतच गोसावियांना सामोरा आला. दंडवत घातले. पुजावसर झाला. स्वामिंना म्हणाले, "गोमटदेवहो या लेकराच्या आवारासी बीजे करावेजी."


       स्वामिंना होकार देताच राघवभट्टांचा हर्ष गगणात मावेना त्या आनंदाच्या भरात ते गायण करीत, नाचत  बागडत आवाराकडे निघाले. लोक विचारीत राघवदेवहो हे कोण ? गात, नाचत म्हणाले, " हे गोमटदेव बा: हे गोमटदेव बा :" अशा प्रकारे गोसावियांना आपल्या घरी आणला. त्यांची दोन आवार होते. त्यातील देव्हारचौकी स्वामिंना आसन झाले. मर्दना मादने झाले. गोसावियांच्या सर्वांगी चंदनाची पिंजरी लावली. पुजावसर झाला.  सहपरिवार गोसावियांना आरोगणा झाली. विडा ओळगविला. येथे वसती झाला. दुसऱ्या दिवसी सुद्धा राघवदेवाच्या आग्रहावरुन स्वामी थांबले. मग तिसऱ्या दिवसी निघाले. बाइसांनी विचारले बाबा हे कोण ? तेंव्हा स्वमिंनी सांगीतल की हे दुंडीराउळांचे अनुग्रहीत.! ( लीळा चरित्र पूर्वार्ध )

                  ####

     आज कार्तिक कृष्ण पंचमी. डोढ्रा येथील स्थानाचा पदस्पर्श पावन दिन.या स्थानापतीस दंडवत प्रणाम..!
                                        सा.दर्यापुरकर.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Thursday, 2 November 2017

राऊळ माय राऊळ बाप

❕❕राऊळ माय झाले ❕❕

मी काय काय सांगू
राऊळ काय झाले ।
राऊळ बाप झाले
राऊळ माय झाले ।।

आमृत्य ब्रह्मचारी
धन मान लोभ नाही
ही पांगळी व्यवस्था
राऊळ पाय झाले ।।

निच फास घेत होता
उच घास सोनियाचा
दलितास राखले हो
राऊळ साय झाले ।।

जातीत वाटलेले
येथेच एकवटले
एकात्मता दुधाची
राऊळ गाय झाले ।।

बांधू नका स्त्रियांना
त्या तर सुगंध आहे
स्वातंत्र्यगीत त्यांचे
राऊळ हाय झाले ।।

शोषित वंचितांचा
पहिलाच पाठराखा
अन्याय तेथ माझे
राऊळ न्याय झाले ।।

                          ➖मोहन बाभूळगावकर

➖➖➖➖➖➖➖➖➖

Wednesday, 1 November 2017

श्रीक्षेत्र मिरी....

मिरी : ता . पाथर्डी जिल्हा. अहमदनगर.
“”“”“”“”“”“”“”“”“”“”“”“”“”“”“”“”“

मिरी हे गांव शेवगाव ते पांढरीचा पुल या मार्गावर, शेवगावहून २९ किलोमीटर तसेच पांढरी पुला पासुन १४ कि.मि. अंतरावर आहे.
.........
अवस्थान स्थान :

परीभ्रमणाच्या उत्तरार्धात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी रांजनगावहून मिरीला आले. त्यावेळी येथे महालक्ष्मी चे देउळ होते. त्या देवळाच्चा चौकातील हे स्थान. स्वामिंचे या ठिकाणी विस दिवस वास्तव्य होते. रामदेव उपाख्य दादोस दररोज स्वामिंना या ठिकाणी
उपहार करीत. [उ. लीळा २५७]

एके दिवसी भट्टोबासांच्या विनंती वरुन स्वामिंनी त्यांना अटन विधिचे निरोपण केले.
[उ.ली.२५८]

वीस दिवसाच्या वास्तव्या नंतर सर्वज्ञ येथून लोहसर खांडगावला गेले.
                                                                                                                         
                                     .........

दंडवत प्रणाम !                                                           सा. दर्यापुरकर

Tuesday, 22 August 2017

श्री चक्रधर स्वामी....

*▪सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन :*
*~~~~~~~~~~~~~~~~~~*
      सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील एक तत्त्वज्ञ, एक समाजसुधारक, व महानुभाव पंथाचे संस्थापक होत. महानुभाव धर्मीयांच्या श्रद्धेनुसार त्यांना ईश्वराच्या पंचावतारा पैकी पाचवा अवतार मानले जाते. लीळाचरित्र या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे नायक म्हणून मराठी साहित्याच्या इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारुन स्त्री शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात धर्मसुधारक होत.

       सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्य परंपरेत अतिशय मोलाची भर पडली आहे.

*▪प्रारंभिक जीवन:*
*~~~~~~~~~~~~*
        सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवना संबंधी माहिती लीळा चरित्राच्या एकांक या भागात मिळते.

         बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजराथ मधील भडोच येथे श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतार झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे भडोचचा राजा मल्लदेव याचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाई होते. श्रीचक्रधरांचे जन्म नाव हरीपाळदेव असे होते.

        तारुण्यात आल्यावर हरीपाळदेव यांचा विवाह कमळाईसा यांच्याबरोबर झाला. याच काळात त्यांनी युद्धांतही पराक्रम गाजवला.
पुढे हरपाळदेवांना जुगार खेळायचा छंद लागला. बरेचदा ते राजवाडा सोडून जुगार्‍यांबरोबर वेळ घालवू लागले. पुढे त्यांची प्रकृती अचानक खालवली व त्यांचा मृत्यू झाला. परंतु स्मशानात सरणावर ठेवल्यावर हरीपाळदेव जिवंत असल्याचे आढळून आले. यावेळी ईश्वराने हरीपाळदेवाचे पतीत उठवून अवतार धारण केला होता.

        पंचावतारातील तीसरे अवतार श्रीचांगदेव राउळ यांनी त्याच सुमारास कामाख्ये निमित्त पूरत्याग करुन हरीपाळ देवांच्या शरीरात प्रवेश केला. अवतार धारणाची ही घटना शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद शुक्ल द्वितीयेला रविवारी घडली.

         या घटनेनंतर श्रीचक्रधर स्वामिंचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच सुरू झाले. कालौघात त्यांना एक पुत्रही झाला. त्यांचे जुगाराचे व्यसन मात्र तसेच राहिले. एक दिवस द्यूतात हारल्यामुळे त्यांनी देणेकर्‍यांचे पैसे जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत अन्नप्राशन करणार नाही अशी शपथ घेतली. त्यांची पत्नी कमळाइसाने त्यांना या कारणासाठी दागिने देण्यास नकार दिला. शेवटी त्यांच्या वडिलांना देणेकर्‍यांचे पैसे परत करावे लागले.
या घटनेमुळे हरपाळदेव यांना औदासीन्याने ग्रासले. लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले. त्यांनी राजविलासी भोग, संसार-सुख यांचा त्याग करायचा निर्णय घेतला.

         गृहत्याग करण्यासाठी हरपाळदेवांनी रामयात्रेला रामटेक येथे जावयाचे आहे अशी सबब घरी सांगितली. त्यावेळी महाराष्ट्रातील यादव व भडोचचे राज्य यांच्यात कलह सुरू होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी या कल्पनेस विरोध केला. परंतु शेवटी हरीपाळदेवांनी वडिलांचे मन वळविले व त्यांच्या वडिलांनी त्यांना संरक्षणासाठी घोडेस्वार व सेवक यांच्यासह जाण्यास अनुमती दिली. त्यांना आपल्या सोबतचा लवाजमा नको होता. त्यांना सर्वस्वाचा त्याग करावयाचा होता. त्यामुळे त्यांनी एकेका मुक्कामा वरून आपले क्षेमकुशल कळविण्यासाठी एकेक सैनिक परत पाठवणे सुरू केले. शेवटी अमरावती जिल्ह्यातील देऊळवाडा येथे काजळेश्वराच्या मंदिरात मुक्कामास असतांना उरलेले शेवटचे दोन सैनिक निद्राधीन झाल्याचे पाहून आपली राजवस्त्रे तिथेच काढून ठेवून दोन वस्त्रांनिशी ते तिथून निघून गेले.

           तिसऱ्या दिवसी हरीपाळदेव रिद्धपूर येथे आले. तिथे त्यांना रांधवन हाटात श्री गोविंदप्रभु दिसले. गोविंदप्रभूं पासून हरीपाळदेव यांनी उभयशक्ती प्राप्त केल्या याच वेळी श्रीगोविंद प्रभूंनी त्यांना श्रीचक्रधर हे नाव दिले.

*▪एकाकी भटकंतीचा काळ :*
*~~~~~~~~~~~~~~~~~*
          श्री गोविंदप्रभूं पासून शक्ती स्विकार केल्या नंतर श्रीचक्रधर स्वामिंची विरक्ती अधिकच वाढू लागली. लीळाचरित्राच्या एकांक या भागात त्यांच्या या काळातील भ्रमंतीचे वर्णन आहे. या काळात त्यांनी महाराष्ट्रभर एकट्यानेच भटकंती केली. आंध्र प्रदेशाच्या काही भागातही त्यांनी भ्रमण केले. यावेळेपर्यंत श्रीचक्रधर स्वामिंना फारसा शिष्यपरिवार लाभला नव्हता. त्याकाळात श्रीचक्रधर प्रभुंचे वर्तन काहीसे विरक्ताप्रमाणे दिसून येते. एका प्रसंगी वरंगळ येथील एका घोड्याच्या व्यापार्‍याने आपल्या मुलीचे त्यांचेसोबत लग्नही लावून दिले. तिथे काही दिवस राहून ते परत गोंडवनातील आदिवासींच्या सहवासातही ते काही दिवस राहिले. या काळात श्रीचक्रधर स्वामिंना तुरळक शिष्य लाभले, त्यांपैकी वडनेरचे रामदेव दादोस हे प्रमुख होते. त्यांच्यामार्फतच पुढे आचार्य नागदेव, आबाइसा, महादाइसा, उमाइसा इत्यादि शिष्य परिवार मिळाला.

          भ्रमंतीच्या या काळात श्रीचक्रधर स्वामी यांची मेहकर येथे बाणेश्वराच्या मंदिरात बोणेबाईंची भेट झाली. बोणेबाईंना देवकी व स्वतः श्रीकृष्ण बनवून त्यांनी मेहकर येथे गोकुळाष्टमी साजरी केली. बोणेबाईं बरोबर त्यांनी लोणारची यात्राही केली. नंतर एके दिवशी सिंहस्थ यात्रेच्या निमित्ताने ते बोणेबाईं बरोबर त्र्यंबकेश्वरला जाण्यास निघाले. वाटेत पैठण येथे त्यांनी त्र्यंबकेश्वरास जाण्याचा बेत रद्द करून पैठण येथे बाइसांना प्रेमदान दिले. ही घटना शके ११८९ मध्ये घडली.

        अशा तर्‍हेने रिद्धीपुरापासून सुरू झालेले श्रीचक्रधर स्वामिंचे एकाकी भ्रमण पैठण इथे संपले. यानंतरच्या काळात त्यांनी प्रकटपणे समाज व धर्मसुधारणेचे कार्य सुरू केले.
एकाकी भ्रमणाच्या काळात श्री स्वामिंनी लोकजीवन प्रत्यक्ष पाहिले. त्या काळातील सामाजिक व धार्मिक परिस्थितीचे अवलोकन केले. त्यांच्या पुढील ज्ञानदानाच्या कार्याची पूर्वतयारीच या काळात झाली.

*~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..*
*🙏दंडवत प्रणाम..!!🙏*
*************************                  *ई.साधेराज दर्यापुरकर.रिद्धपुर*
*************************
🥀🍂🍂🥀🍂🍂🥀🍂🍂🥀

श्री चक्रधर स्वामीं चा पाळणा.. येथे क्लिक करा.

Thursday, 17 August 2017

वोडनझडपा गृही क्रिडा : ऋद्धपुर

💥💥💥💥💥💥💥💥
वोडनझडपा गृही क्रिडा : ऋद्धपुर
-----------------------------
स्थानाची माहिती :
         हे स्थान राजमठा पासुन विश्राम गृहाकडे जातांना जवळच रस्त्याच्या डाविकडे छोट्या मंदिरात आहे. त्या ठिकाणी राजदरबारचा शिपाई वोडनझडपा पत्नी सह राहत होता.
               🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸                     
लिळा:-
             ऋद्धपुर मधे जरी श्री गोविंद प्रभु दररोज क्रिडा करीत होते, तरी अद्याप ते वोडनझडपाच्या घरी कधी गेले नव्हते. कारण तो शिपाई पदावर होता, व स्वभावाने अतिशय ख्वाष्ट.
           एके दिवसी गोसावी क्रिडा करीत त्याच्या घरी गेले, सोबत माहीमभट्ट, व आचार्य होते. गोसावी घरात बीजे करतील म्हणून वोडनझडपाची पत्नी दारात उभी राहीली. आत मधे जाउ देइना. श्री प्रभु म्हणाले, “ आवो मेली जाए, परती होएना म्हणे : परती जाए : परती जाएना म्हणे : अवो मेली परती होएना म्हणे :” तरी ती परत फिरली नाही. मग गोसावी कोपु स्विकारला. आलोहीत वाम नेत्र उघडला : अधर कापु लागले, आणि म्हणाले, “ आवो मेली जाए तू परती म्हणे : ” व पाठीवर एक थाप मारुन तिला ढकलून दिले. ती रडत पडत दारातच उभी राहीली.
        गोसावी आत आले व उतरंडी उतरु लागले. दोन्ही हाता मधे धान्याची मडकी घेउन जोर जोराने श्वास घेत मधे आणून रिचवित. व रिकामी मडकी दारात नेउन फोडली. सिंक्यावरचे दही, दूधाची मडकी मधे आणून ठेवली. तिळ, तांदूळ, साळी, गुळ, गहु, उडीद, मुग, चणे, तुरी, राळे, चवळी, भादली, तुर डाळ, उडीद दाळ, चणा डाळ, वडे, पापड, सांडया, कुरडया, असे सर्व एकत्रित करुन त्या राशीवर आडासनी श्री चरण मधे घालुन  त्यावर बसले. भट, माहिमभट्ट ईवलीसी तोंडे करुन बघू लागले. भट्ट म्हणाले, “माहिमभटो आता काय करावे.? तो दुष्ट राजपुत आता येईल. त्याला काय उत्तर द्याव.”
        एव्हड्यात पैलाकडून वोडनझडपा येतांना बघीतला..!  भट्ट, माहिमभट्ट समोर गेले व म्हणाले, “ वोडनझडपे हो आज गोसावी तुमच्या गृही बीजे केले असे. ” तो म्हणाला बरे झाले, कधी नव्हे तर आज माझ्या घरी बीजे केले. दैव भाग्य माझ." तुमच्या स्त्री ला पाठीवर हाणले. ती गोसावियांना आत मधे येउ देत नव्हती म्हणून. तो म्हणाला, “ भली हाणीतली, राउळांना कां आत येउ देत नव्हती..? राउळ विणाकारण का मारतील..  भट म्हणाले, “तुमच्या उतरंडीचे मडके फोडीली. ”  तो म्हणाला, माझी खापराची फोडली तर, गोसावी मज तांबा, पितळेची देतील..”  भट म्हणाले, तुमचे सर्व धान्य  नासविले.” तो म्हणाला, “ राउळांनी माझे पाप नासले, मी कृत्याकृत्त झालो. मग तो घरा मधे आला.
          गोसावी घरातच होते. त्याला पाहीले व भय स्विकारले, व बाहेर निगू लागसे. मग तो म्हणाला, “जी जी आता पर्यंत गेले असता तर ठिक होत, आता कसे जाल”, व समोर आडवा पडला.
      मग भट, माहिमभट्ट म्हणाले, प्रभु विनंती स्विकारा यांची. श्रीप्रभुंनी विनंती मान्य केली. म्हणाले, “अवो मेला जाए, उठी उठी म्हणे :” मग तो उठला, बाज सुपवती घातली, त्यावर चादर अंथरली,  घर स्वच्छ केले. सडा समार्जन केले. रागोळ्या काढल्या. बाजारा मधुन कणिक, तांदूळ आणले, माहिमभटांनी उपहाराची तयारी केली. वोडनझडपाने गोसावियांना मर्दना मादने दिधले, नवीन वस्त्र ओळगविली. पुजावसर झाला. आरोगणा झाली. गुळूळा, विडा झाला. भटा, माहीमभटांची गोसावीयांचे दृष्टिसमोर जेवणे झाली. वोडनझडपा म्हणाला, “ जी: जी गावा वेगळा अपवित्र होता जी, अनाथ अपवित्र होता जी, आज पवित्र, सनाथ केला जी.”
       मग भट, माहिमभट्ट गोसावीयांसोबत मढात बिजे केले. ओडनझडपा मढापर्यंत बोळवित आला. त्या दिवसा पासुन गोसावी मधुन त्याचेकडे जात. तेंव्हा पासुन वोडनझडपाच्या घरात तांब्याची भांडी आली. जरी सोन्या चांदीची मागीतली असती तर सोन्याची झाली असती. (ऋ.च. उत्त.९०)        
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
साधेराज दर्यापुरकर@_रिद्धपुर.
दंडवत प्रणाम
..

Friday, 11 August 2017

पोवाडा - श्री चक्रधर स्वामींचे शिष्य निळभट्ट भांडारेकार

पोवाडा भाग - १

पोवाडा भाग - २

दण्डवत प्रणाम

परब्रम्ह परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी ८०० वर्षापूर्वी
अन्यथा ज्ञाना मधे भरकटलेल्या या सकल जन माणसांना यथार्थ ज्ञान देवून त्यांच्या जिवोध्दरना साठी पायी भ्रमण करत पूर्ण महाराष्ट्र पदस्पर्शाने पावन केला..
 याच काळात स्वामींच्या सहवासात एक शिष्य आले त्यांच नाव निळभट्ट भांडारेकार
फक्त अंगावरच्या कपड्यावर निघालेला हा गृहस्थ त्याच्या त्यागाची महती शाहीरांनी या पोवाड्या मधे केली आहे..

दोन भागात विभागणी केलेला हा पोवाडा आपल्या  सेवेत

भाग - १
https://youtu.be/auXIzf8y6ys

भाग - २
https://youtu.be/RDbKCmEfQio

वरील लिंक वर क्लिक करून आपण ऐकू शकता...



Wednesday, 2 August 2017

जेव्हा गुरुवर्य देवरक्षो म्हणतात



महादाइसी म्हणितले ,जी जी ,आम्ही तुम्हासी दंडवतेकरीत तर गोसावी कायी म्हणती जी ?
यावरी सर्वज्ञे म्हणितले ,बाई हे ऐसे म्हणे ,जे जीव सर्व दोषाचे आळे तर तया  सर्व दोषापासौनि चैतन्या पर परमेश्वर तो देवो तुम्हा रक्षी ऐसे म्हणती की बाई. यावरूनच देवरक्षो ऐसा शब्दे आशिर्वाद प्रचलीत झाला असावा असे वाटते.तसेच पुढील दंडवत करणार्या व्यक्तीस देवरक्षो या शब्दाने वासनीकास चार प्रकारचे आशीर्वाद घडतात.असे एका संशोधन कर्त्याने अर्थ लावला आहे.
जसे ,"दे+व+र+क्षो "यात 'दे'म्हणजे देतानी शत आयुष्यानी, शंभर वर्षाचे पूर्ण आयुष्यमान होवो ! 'व' म्हणजे म्हवंकारे वंशवृध्दीनाम् वंशाची वाढवृध्दी होवो ! 'र' म्हणजे रक्षन्ते सर्व पापानि -सर्व दोषांपासून रक्षण होवो ! 'क्ष' म्हणजे क्षालनम् भव नाशनम् -भवनाम् संसाराचे क्षालन होवो ! या प्रकारचे चार आशीर्वाद मिळतात. करिता वासनीकाने भिक्षुकास नम्रतापूर्वक दंडवत प्रणाम अवश्य करावा.थोर लाभ असे ! पुज्य मानावे .
सौजन्य - ई.श्री. भाईदेव बिडकर फलटण

प्रसादसेवा स्तोत्र.....On Youtube

Tuesday, 1 August 2017

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रविण भाऊ

आपल्या परीवारातील प्रविण पी.पी. नावाने ओळख आहे त्यांची.
सिल्वासा (दादरा नगर हवेली) येथे पोलीस मधे आहेत.
त्यांचा आज वाढदिवस..
पी.पी.. लाख लाख शुभेच्छा वाढदिवसाच्या..
💐💐💐💐💐💐

Monday, 31 July 2017

दण्डवत प्रणाम

दण्डवत प्रणाम

अगदी सहज चालू केलं मी youtube चं Channel Mahanubhav महानुभाव
https://www.youtube.com/channel/UCGJQDlH7MAQr0GAZmi0495g
आणि बघता आपण सर्वांनी त्याला खुप प्रेम पूर्वक प्रतिसाद दिला..

त्या निमित्तानं ....

सर्वज्ञ श्री चक्रधरांचा हा परिवार खरचं किती परम प्रिती ने परिपूर्ण आहे ना..
मी चॕनल चालू करतोय म्हटलोय तर आमच्या Whatsapp च्या JSK ग्रुप ला खुप आनंद झाला.
त्यात दादांनी दिलेला आशिर्वाद असो वा एन के सरांचा काहीही अडचण आली की मी आहेच असा आधार.. की आमच्या पिडी सरांच प्रेम ग्रुप ला वाकडं वाकडं बोलायचे पण स्वतः चॕनल सस्क्राईब करुन ईतरांनाही करायला लावणारे...
अस्सं काही..

चॕनल बद्दल बोलायचं झालं तर अगदी काही माहीत नसताना सहज एक चित्रफित अपलोड करायची म्हणून केली.. मग सहजच चॕनल क्रिएट झालं..
मग विचार आला का नं आपण माझ्या पंथाच्या भजनाचा आणि स्थानांच्या फोटोचा जो संग्रह माझ्याकडे आहे त्याचा उपयोग या साठी व्हावा...
मग झाली एकदाची सुरवात.
मग एक एक गोष्ट कळत गेली. आणि चित्रफीत अपलोड करत गेलो.
पंथिय साधकांनी तेवढचं प्रेम या चॕनल ला दिलं..
यात Whatsapp आणि आमच्या फेसबुक च्या महानुभाव तिर्थस्थाने या पेजची खुप मदत झाली..
अगदी नवखं चॕनल असताना १५ चं दिवसामध्ये चॕनल ने १०,००० Views पूर्ण केले...
आज चॕनल मध्ये

१)प्रसादसेवा - https://youtu.be/xfWRW7FuWjc

२)प्रातःकाळची आरती - https://youtu.be/90z3UmNejIU

३)मीच सुमन झालो भजन - https://youtu.be/LpjNU0XEkoM

४) चिंतामणी स्तोत्र - https://youtu.be/ZUFQbMPMy-o

५) संसारपाश स्तोत्र - https://youtu.be/iyMPH-n1UxM

६) श्री गोविंद प्रभूंची आरती - https://youtu.be/d5H_5wm7klo

७) श्री चक्रपाणी प्रभू भजन - https://youtu.be/iVNVc6mnYO8

८) भुपाळी - https://youtu.be/QMzEb8RCLxY

९) श्री रिध्दपूर स्थानदर्शन - https://youtu.be/K_t1bFKoDaY

१०) श्रीक्षेत्र अंबाळी निद्रेची आरती - https://youtu.be/Z6G5moaA2N0

११) मधूराकाष्टम् - https://youtu.be/HbsGBT7_PHw

या सर्वांसह जवळपास ३० चित्रफितीं चा संग्रह आहे..

खरोखरच खूप आनंद आहे सहज केलेली ही सुरवात आज
३३३ सस्क्राईबर अन् ५०,००० View सहीत पूर्ण करुण आपल्या पंथातील चॕनल मध्ये स्वतःची जागा निर्माण करुन दिमाखात चालू आहे....

सर्वज्ञ चरणी एवढी एकच प्रार्थना आहे की ही सेवा अशीच उत्तरोत्तर माझ्याकडून व्हावी यासाठी उदंड बळ आणि सर्वांच भरभरून प्रेम मिळत राहो..

दण्डवत प्रणाम
आपलाच..
सागर आ. मते

श्री क्षेत्र मनसर...

मनसीळा : आसन स्थान
!!””!!””!!””!!””!!””!!”!!
मनसर जवळील हे स्थान हैदराबाद दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर नागपुर पासुन ईशान्येस ४० कि.मि. काटोल ते मनसर नागपुर मार्गे ९७ कि.मि. आहे.
फोटो मधील मनसिळा आसन स्थान मनसर येथील श्री चक्रधर स्वामी मंदिरा पासुन जवळच टेकडीवर आहे. वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.

दंडवत प्रणाम..

सौ.- सा.दर्यापुरकर..

Sunday, 30 July 2017

श्री क्षेत्र भंडारा स्थानदर्शन तथा लिळा.




श्री क्षेत्र भंडारा येथील स्थानाची लीळा :
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जीवोद्धाराचे अवतार कार्य स्विकारुन अवतरलेले आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु, आपल्या उद्धार कार्याची सुरुवात करुन, भंडारा येथे आले. श्री निळभट्ट भांडारेकार यांना निमित्त करुन त्यांनी आपल्या उद्धरण कार्याचा शुभारंभ केला. शिष्य समुदायातील सर्वाद्य शिष्य होण्याचे भाग्य निळभट्टाकडे जाते.
काण्व शाखेचे ब्राह्मण निळभट्ट आपल्या वाड्याच्या ओसरीवर पोथी बघत बसले होते. पण त्यांच्या प्रश्नाचे उत्तर काही त्यांना मिळत नव्हते. त्याच वेळी परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांच्या समोर येउन उभे राहिले. श्रीमुखीच्या परावाणीतून उच्चारलेल्या, “ भिक्षा ” या अमृतवाद ऐकुण देखील, अधोमूख असलेले निळभट्ट दृष्टि वर करुन गोसावियांची वास न पाहता पोथी चाळण्यात मग्न असतात.
जीव स्वरुपातिल अधोमुखतेचा हा जन्मजात दोष दूर करुन, त्याला त्याला उर्ध्वमूख करण्यासाठी सर्वज्ञ श्री ची अमृत वर्षणी वाणी स्त्रवली व “भट्टो मागींल फाकी पहा,” म्हणताच निळभट्टांनी मान वर करुन श्रीमूर्ती कडे बघीतले. मात्र सर्वज्ञांच्या ठायी असलेल्या अमर्याद गुणानिधितील दातृत्व, सह्रदत्व, हितक्षत्व ये तिन्ही उमटली. त्यांना इश्री गुणसामर्थ्याचा प्रत्यय आला आणि “हाच तो परमेश्वर याची अनुभूति झाली. येथेच जीवोद्धारण कार्याचा शुभारंभ जीवाला उर्ध्वगामी करण्याचा साक्षात्कार..
आमचे स्वामी साधेला म्हणतात, “ साधेहो, जीव ऐसे अधोमूख असती : परमेश्वरु ऐसे वरीपडौनी पाहत असती : एकाधा ऐसा वरैती वास पाहिल, तरी तयाते ऐसाची काढीजैल : (आ.२१३)
आणि खरोखर इश्वरीच्या ठायी असलेल्या जीवा बद्लच्या आत्यंतिक हितक्षेचा, शुभ चिंतनाचा, सैहार्दाचा साक्षात्कार सर्वज्ञां कडून झाल्यावर तो विद्वान ब्राह्मण संसाराचा “मळवत् त्याग ” करुन सर्वज्ञांचे पाठोपाठ निघाला. त्यांच्या पत्निने केविलवाने विचारलेल्या, “के निघालेती ” या प्रश्नाने त्यांना अडविण्याच्या केलेल्या प्रयत्नांना “आता हे जयाचे तया सव निघाले:” अस आत्मप्रतिती पूर्वक उत्तर देउन, हे प्रथम शिष्योत्तम गोसावीया सरीसे, निघाले.
इश्वरीच्या ठायी असलेल्या जीवा बद्दल असलेला आत्यंतिक आत्मत्वाचा प्रत्यय आल्यामुळे लौकिक, वैयक्तिक जीवनाच्या सीमांचा परिच्छेद करुन विशाल, पारमार्थीक, आध्यात्मिक शुभारंभाचे पवित्र असे हे स्थान..
.....
जय श्रीचक्रधर प्रभु...
सा.दर्यापुरकर
«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»

Saturday, 29 July 2017

डाकराम सुकळी स्थान - लिळा




श्री क्षेत्र डाकराम सुकळी
जिल्हा गोंदिया.

...
सिंहनाद करने स्थान :
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एकांकी भ्रमण करीत असतांना एके दिवसी घनदाट जंगलामधे वसलेल्या डाकराम या गांवी पोचले. गावामधे करपात्री भिक्षा केली. आरोगणा झाली. सायंकाळी निद्रा करण्यासाठी गावाला लागुनच असलेल्या भिवेश्वर मंदिराकडे आले. तेथे पारावर [ए.वा.पौळीवर] गांवातील लोक बसले होते. त्यांनी सर्वज्ञ मंदिराकडे जातांना बघून म्हणाले, "देव हो या देवळाकडे जाउ नका. येथे रोज रात्री वाघ येतो." त्या अगाधचक्रवर्तीने लोकांचे म्हणने दुर्लक्षीत करुन, मंदिरात गेले चौकात आसन झाले. नंतर निद्रा झाली.
मध्यरात्री लोकांनी सांगीतल्या प्रमाणे विश्रांती साठी वाघ आला. सर्वज्ञाकडे कटाक्ष टाकून डरकाळी फोडली. सर्वज्ञांनी केलेला सिंहनाद ऐकून वाघ पौळीवरुन [wall compound] उडी मारुन जंगलामधे निघून गेला. गोसावियानी निद्रा केली. प्रात:काळी उठून ध्यानस्त बसले असता, सकाळी गावातील लोक देवतेची पुजा करण्यासाठी टाळ, घोळ, काहाळा, कासौळी, मादळ वाजवित व मोठ्याने आवाज करीत मंदिराकडे आले. त्यांचा हा नित्य क्रमच होता. कारण वाद्याच्या आवाजाने देवळातील वाघ निघून जात असे. परंतु आज मात्र वाघ निघाला नाही. मग एकमेकांना म्हणू लागले की,"सायंकाळी जे देव या ठिकाणी आले त्यांना नक्कीच वाघाने उपद्रव केला असेल. चला बघू या !"
म्हणून भित भितच मंदिरामधे आले. चौकामधे स्वामी आसनस्थ होते. "अरे हे तर इश्वर पुरुष " म्हणून सर्वांनी दंडवते घातली श्री चरणा लागले व म्हणाले, "जी जी येथे वाघ आला होता?"
"हो आला होता." सर्वज्ञ म्हणाले.
" जी जी, मग पुढे काय घडल?
स्वामी म्हणाले, " तो आला आमच्याकडे बघून डरकाळी फोडली, येथून सिंहनाद करताच तो भ्याला व पौळी वरुन उडी मारुन जंगला मधे निघून गेला. हे बघा पौळीचे दगड पडलेत..! आता यापुढे तो वाघ येथे येणार नाही. तुम्ही निश्चिंत रहा."
महादाइसांनी विचारल्यावरुन स्वामी म्हणतात, " बाई तेंव्हा पासुन ही वस्ती निरुपद्रवी झाली." (ली.च. पू.३३)
******
सा.दर्यापुरकर

दण्डवत प्रणाम ......



दण्डवत प्रणाम

आज बहूत ही आनंद हो रहा है.
अब मेरे youtube channel - Mahanubhav महानुभाव को जो आप सब ने सपोर्ट किया..
सोचा यहा पर भी आप से जुड रहा हुँ.. यहा पर मैं आपको स्थान के पोटोस् के साथ स्थान की लिलाए पढणे के लिए लाऊंगा.. साथ कुछ अन्य ज्ञान के पोस्ट भी लाऊंगा...

बस आप सपोर्ट करते रहे..

धन्यवाद
दण्डवत प्रणाम ...