*▪सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन :*
*~~~~~~~~~~~~~~~~~~*
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील एक तत्त्वज्ञ, एक समाजसुधारक, व महानुभाव पंथाचे संस्थापक होत. महानुभाव धर्मीयांच्या श्रद्धेनुसार त्यांना ईश्वराच्या पंचावतारा पैकी पाचवा अवतार मानले जाते. लीळाचरित्र या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे नायक म्हणून मराठी साहित्याच्या इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारुन स्त्री शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात धर्मसुधारक होत.
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्य परंपरेत अतिशय मोलाची भर पडली आहे.
*▪प्रारंभिक जीवन:*
*~~~~~~~~~~~~*
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवना संबंधी माहिती लीळा चरित्राच्या एकांक या भागात मिळते.
बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजराथ मधील भडोच येथे श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतार झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे भडोचचा राजा मल्लदेव याचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाई होते. श्रीचक्रधरांचे जन्म नाव हरीपाळदेव असे होते.
तारुण्यात आल्यावर हरीपाळदेव यांचा विवाह कमळाईसा यांच्याबरोबर झाला. याच काळात त्यांनी युद्धांतही पराक्रम गाजवला.
पुढे हरपाळदेवांना जुगार खेळायचा छंद लागला. बरेचदा ते राजवाडा सोडून जुगार्यांबरोबर वेळ घालवू लागले. पुढे त्यांची प्रकृती अचानक खालवली व त्यांचा मृत्यू झाला. परंतु स्मशानात सरणावर ठेवल्यावर हरीपाळदेव जिवंत असल्याचे आढळून आले. यावेळी ईश्वराने हरीपाळदेवाचे पतीत उठवून अवतार धारण केला होता.
पंचावतारातील तीसरे अवतार श्रीचांगदेव राउळ यांनी त्याच सुमारास कामाख्ये निमित्त पूरत्याग करुन हरीपाळ देवांच्या शरीरात प्रवेश केला. अवतार धारणाची ही घटना शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद शुक्ल द्वितीयेला रविवारी घडली.
या घटनेनंतर श्रीचक्रधर स्वामिंचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच सुरू झाले. कालौघात त्यांना एक पुत्रही झाला. त्यांचे जुगाराचे व्यसन मात्र तसेच राहिले. एक दिवस द्यूतात हारल्यामुळे त्यांनी देणेकर्यांचे पैसे जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत अन्नप्राशन करणार नाही अशी शपथ घेतली. त्यांची पत्नी कमळाइसाने त्यांना या कारणासाठी दागिने देण्यास नकार दिला. शेवटी त्यांच्या वडिलांना देणेकर्यांचे पैसे परत करावे लागले.
या घटनेमुळे हरपाळदेव यांना औदासीन्याने ग्रासले. लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले. त्यांनी राजविलासी भोग, संसार-सुख यांचा त्याग करायचा निर्णय घेतला.
गृहत्याग करण्यासाठी हरपाळदेवांनी रामयात्रेला रामटेक येथे जावयाचे आहे अशी सबब घरी सांगितली. त्यावेळी महाराष्ट्रातील यादव व भडोचचे राज्य यांच्यात कलह सुरू होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी या कल्पनेस विरोध केला. परंतु शेवटी हरीपाळदेवांनी वडिलांचे मन वळविले व त्यांच्या वडिलांनी त्यांना संरक्षणासाठी घोडेस्वार व सेवक यांच्यासह जाण्यास अनुमती दिली. त्यांना आपल्या सोबतचा लवाजमा नको होता. त्यांना सर्वस्वाचा त्याग करावयाचा होता. त्यामुळे त्यांनी एकेका मुक्कामा वरून आपले क्षेमकुशल कळविण्यासाठी एकेक सैनिक परत पाठवणे सुरू केले. शेवटी अमरावती जिल्ह्यातील देऊळवाडा येथे काजळेश्वराच्या मंदिरात मुक्कामास असतांना उरलेले शेवटचे दोन सैनिक निद्राधीन झाल्याचे पाहून आपली राजवस्त्रे तिथेच काढून ठेवून दोन वस्त्रांनिशी ते तिथून निघून गेले.
तिसऱ्या दिवसी हरीपाळदेव रिद्धपूर येथे आले. तिथे त्यांना रांधवन हाटात श्री गोविंदप्रभु दिसले. गोविंदप्रभूं पासून हरीपाळदेव यांनी उभयशक्ती प्राप्त केल्या याच वेळी श्रीगोविंद प्रभूंनी त्यांना श्रीचक्रधर हे नाव दिले.
*▪एकाकी भटकंतीचा काळ :*
*~~~~~~~~~~~~~~~~~*
श्री गोविंदप्रभूं पासून शक्ती स्विकार केल्या नंतर श्रीचक्रधर स्वामिंची विरक्ती अधिकच वाढू लागली. लीळाचरित्राच्या एकांक या भागात त्यांच्या या काळातील भ्रमंतीचे वर्णन आहे. या काळात त्यांनी महाराष्ट्रभर एकट्यानेच भटकंती केली. आंध्र प्रदेशाच्या काही भागातही त्यांनी भ्रमण केले. यावेळेपर्यंत श्रीचक्रधर स्वामिंना फारसा शिष्यपरिवार लाभला नव्हता. त्याकाळात श्रीचक्रधर प्रभुंचे वर्तन काहीसे विरक्ताप्रमाणे दिसून येते. एका प्रसंगी वरंगळ येथील एका घोड्याच्या व्यापार्याने आपल्या मुलीचे त्यांचेसोबत लग्नही लावून दिले. तिथे काही दिवस राहून ते परत गोंडवनातील आदिवासींच्या सहवासातही ते काही दिवस राहिले. या काळात श्रीचक्रधर स्वामिंना तुरळक शिष्य लाभले, त्यांपैकी वडनेरचे रामदेव दादोस हे प्रमुख होते. त्यांच्यामार्फतच पुढे आचार्य नागदेव, आबाइसा, महादाइसा, उमाइसा इत्यादि शिष्य परिवार मिळाला.
भ्रमंतीच्या या काळात श्रीचक्रधर स्वामी यांची मेहकर येथे बाणेश्वराच्या मंदिरात बोणेबाईंची भेट झाली. बोणेबाईंना देवकी व स्वतः श्रीकृष्ण बनवून त्यांनी मेहकर येथे गोकुळाष्टमी साजरी केली. बोणेबाईं बरोबर त्यांनी लोणारची यात्राही केली. नंतर एके दिवशी सिंहस्थ यात्रेच्या निमित्ताने ते बोणेबाईं बरोबर त्र्यंबकेश्वरला जाण्यास निघाले. वाटेत पैठण येथे त्यांनी त्र्यंबकेश्वरास जाण्याचा बेत रद्द करून पैठण येथे बाइसांना प्रेमदान दिले. ही घटना शके ११८९ मध्ये घडली.
अशा तर्हेने रिद्धीपुरापासून सुरू झालेले श्रीचक्रधर स्वामिंचे एकाकी भ्रमण पैठण इथे संपले. यानंतरच्या काळात त्यांनी प्रकटपणे समाज व धर्मसुधारणेचे कार्य सुरू केले.
एकाकी भ्रमणाच्या काळात श्री स्वामिंनी लोकजीवन प्रत्यक्ष पाहिले. त्या काळातील सामाजिक व धार्मिक परिस्थितीचे अवलोकन केले. त्यांच्या पुढील ज्ञानदानाच्या कार्याची पूर्वतयारीच या काळात झाली.
*~~~~~~~~~~~~~~~~~~*
*सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..*
*🙏दंडवत प्रणाम..!!🙏*
************************* *ई.साधेराज दर्यापुरकर.रिद्धपुर*
*************************
🥀🍂🍂🥀🍂🍂🥀🍂🍂🥀
श्री चक्रधर स्वामीं चा पाळणा.. येथे क्लिक करा.
*~~~~~~~~~~~~~~~~~~*
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील एक तत्त्वज्ञ, एक समाजसुधारक, व महानुभाव पंथाचे संस्थापक होत. महानुभाव धर्मीयांच्या श्रद्धेनुसार त्यांना ईश्वराच्या पंचावतारा पैकी पाचवा अवतार मानले जाते. लीळाचरित्र या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे नायक म्हणून मराठी साहित्याच्या इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारुन स्त्री शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात धर्मसुधारक होत.
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्य परंपरेत अतिशय मोलाची भर पडली आहे.
*▪प्रारंभिक जीवन:*
*~~~~~~~~~~~~*
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवना संबंधी माहिती लीळा चरित्राच्या एकांक या भागात मिळते.
बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजराथ मधील भडोच येथे श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतार झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे भडोचचा राजा मल्लदेव याचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाई होते. श्रीचक्रधरांचे जन्म नाव हरीपाळदेव असे होते.
तारुण्यात आल्यावर हरीपाळदेव यांचा विवाह कमळाईसा यांच्याबरोबर झाला. याच काळात त्यांनी युद्धांतही पराक्रम गाजवला.
पुढे हरपाळदेवांना जुगार खेळायचा छंद लागला. बरेचदा ते राजवाडा सोडून जुगार्यांबरोबर वेळ घालवू लागले. पुढे त्यांची प्रकृती अचानक खालवली व त्यांचा मृत्यू झाला. परंतु स्मशानात सरणावर ठेवल्यावर हरीपाळदेव जिवंत असल्याचे आढळून आले. यावेळी ईश्वराने हरीपाळदेवाचे पतीत उठवून अवतार धारण केला होता.
पंचावतारातील तीसरे अवतार श्रीचांगदेव राउळ यांनी त्याच सुमारास कामाख्ये निमित्त पूरत्याग करुन हरीपाळ देवांच्या शरीरात प्रवेश केला. अवतार धारणाची ही घटना शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद शुक्ल द्वितीयेला रविवारी घडली.
या घटनेनंतर श्रीचक्रधर स्वामिंचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच सुरू झाले. कालौघात त्यांना एक पुत्रही झाला. त्यांचे जुगाराचे व्यसन मात्र तसेच राहिले. एक दिवस द्यूतात हारल्यामुळे त्यांनी देणेकर्यांचे पैसे जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत अन्नप्राशन करणार नाही अशी शपथ घेतली. त्यांची पत्नी कमळाइसाने त्यांना या कारणासाठी दागिने देण्यास नकार दिला. शेवटी त्यांच्या वडिलांना देणेकर्यांचे पैसे परत करावे लागले.
या घटनेमुळे हरपाळदेव यांना औदासीन्याने ग्रासले. लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले. त्यांनी राजविलासी भोग, संसार-सुख यांचा त्याग करायचा निर्णय घेतला.
गृहत्याग करण्यासाठी हरपाळदेवांनी रामयात्रेला रामटेक येथे जावयाचे आहे अशी सबब घरी सांगितली. त्यावेळी महाराष्ट्रातील यादव व भडोचचे राज्य यांच्यात कलह सुरू होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी या कल्पनेस विरोध केला. परंतु शेवटी हरीपाळदेवांनी वडिलांचे मन वळविले व त्यांच्या वडिलांनी त्यांना संरक्षणासाठी घोडेस्वार व सेवक यांच्यासह जाण्यास अनुमती दिली. त्यांना आपल्या सोबतचा लवाजमा नको होता. त्यांना सर्वस्वाचा त्याग करावयाचा होता. त्यामुळे त्यांनी एकेका मुक्कामा वरून आपले क्षेमकुशल कळविण्यासाठी एकेक सैनिक परत पाठवणे सुरू केले. शेवटी अमरावती जिल्ह्यातील देऊळवाडा येथे काजळेश्वराच्या मंदिरात मुक्कामास असतांना उरलेले शेवटचे दोन सैनिक निद्राधीन झाल्याचे पाहून आपली राजवस्त्रे तिथेच काढून ठेवून दोन वस्त्रांनिशी ते तिथून निघून गेले.
तिसऱ्या दिवसी हरीपाळदेव रिद्धपूर येथे आले. तिथे त्यांना रांधवन हाटात श्री गोविंदप्रभु दिसले. गोविंदप्रभूं पासून हरीपाळदेव यांनी उभयशक्ती प्राप्त केल्या याच वेळी श्रीगोविंद प्रभूंनी त्यांना श्रीचक्रधर हे नाव दिले.
*▪एकाकी भटकंतीचा काळ :*
*~~~~~~~~~~~~~~~~~*
श्री गोविंदप्रभूं पासून शक्ती स्विकार केल्या नंतर श्रीचक्रधर स्वामिंची विरक्ती अधिकच वाढू लागली. लीळाचरित्राच्या एकांक या भागात त्यांच्या या काळातील भ्रमंतीचे वर्णन आहे. या काळात त्यांनी महाराष्ट्रभर एकट्यानेच भटकंती केली. आंध्र प्रदेशाच्या काही भागातही त्यांनी भ्रमण केले. यावेळेपर्यंत श्रीचक्रधर स्वामिंना फारसा शिष्यपरिवार लाभला नव्हता. त्याकाळात श्रीचक्रधर प्रभुंचे वर्तन काहीसे विरक्ताप्रमाणे दिसून येते. एका प्रसंगी वरंगळ येथील एका घोड्याच्या व्यापार्याने आपल्या मुलीचे त्यांचेसोबत लग्नही लावून दिले. तिथे काही दिवस राहून ते परत गोंडवनातील आदिवासींच्या सहवासातही ते काही दिवस राहिले. या काळात श्रीचक्रधर स्वामिंना तुरळक शिष्य लाभले, त्यांपैकी वडनेरचे रामदेव दादोस हे प्रमुख होते. त्यांच्यामार्फतच पुढे आचार्य नागदेव, आबाइसा, महादाइसा, उमाइसा इत्यादि शिष्य परिवार मिळाला.
भ्रमंतीच्या या काळात श्रीचक्रधर स्वामी यांची मेहकर येथे बाणेश्वराच्या मंदिरात बोणेबाईंची भेट झाली. बोणेबाईंना देवकी व स्वतः श्रीकृष्ण बनवून त्यांनी मेहकर येथे गोकुळाष्टमी साजरी केली. बोणेबाईं बरोबर त्यांनी लोणारची यात्राही केली. नंतर एके दिवशी सिंहस्थ यात्रेच्या निमित्ताने ते बोणेबाईं बरोबर त्र्यंबकेश्वरला जाण्यास निघाले. वाटेत पैठण येथे त्यांनी त्र्यंबकेश्वरास जाण्याचा बेत रद्द करून पैठण येथे बाइसांना प्रेमदान दिले. ही घटना शके ११८९ मध्ये घडली.
अशा तर्हेने रिद्धीपुरापासून सुरू झालेले श्रीचक्रधर स्वामिंचे एकाकी भ्रमण पैठण इथे संपले. यानंतरच्या काळात त्यांनी प्रकटपणे समाज व धर्मसुधारणेचे कार्य सुरू केले.
एकाकी भ्रमणाच्या काळात श्री स्वामिंनी लोकजीवन प्रत्यक्ष पाहिले. त्या काळातील सामाजिक व धार्मिक परिस्थितीचे अवलोकन केले. त्यांच्या पुढील ज्ञानदानाच्या कार्याची पूर्वतयारीच या काळात झाली.
*~~~~~~~~~~~~~~~~~~*
*सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..*
*🙏दंडवत प्रणाम..!!🙏*
************************* *ई.साधेराज दर्यापुरकर.रिद्धपुर*
*************************
🥀🍂🍂🥀🍂🍂🥀🍂🍂🥀
श्री चक्रधर स्वामीं चा पाळणा.. येथे क्लिक करा.
No comments:
Post a Comment