Tuesday, 22 August 2017

श्री चक्रधर स्वामी....

*▪सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन :*
*~~~~~~~~~~~~~~~~~~*
      सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील एक तत्त्वज्ञ, एक समाजसुधारक, व महानुभाव पंथाचे संस्थापक होत. महानुभाव धर्मीयांच्या श्रद्धेनुसार त्यांना ईश्वराच्या पंचावतारा पैकी पाचवा अवतार मानले जाते. लीळाचरित्र या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे नायक म्हणून मराठी साहित्याच्या इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारुन स्त्री शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात धर्मसुधारक होत.

       सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्य परंपरेत अतिशय मोलाची भर पडली आहे.

*▪प्रारंभिक जीवन:*
*~~~~~~~~~~~~*
        सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवना संबंधी माहिती लीळा चरित्राच्या एकांक या भागात मिळते.

         बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजराथ मधील भडोच येथे श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतार झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे भडोचचा राजा मल्लदेव याचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाई होते. श्रीचक्रधरांचे जन्म नाव हरीपाळदेव असे होते.

        तारुण्यात आल्यावर हरीपाळदेव यांचा विवाह कमळाईसा यांच्याबरोबर झाला. याच काळात त्यांनी युद्धांतही पराक्रम गाजवला.
पुढे हरपाळदेवांना जुगार खेळायचा छंद लागला. बरेचदा ते राजवाडा सोडून जुगार्‍यांबरोबर वेळ घालवू लागले. पुढे त्यांची प्रकृती अचानक खालवली व त्यांचा मृत्यू झाला. परंतु स्मशानात सरणावर ठेवल्यावर हरीपाळदेव जिवंत असल्याचे आढळून आले. यावेळी ईश्वराने हरीपाळदेवाचे पतीत उठवून अवतार धारण केला होता.

        पंचावतारातील तीसरे अवतार श्रीचांगदेव राउळ यांनी त्याच सुमारास कामाख्ये निमित्त पूरत्याग करुन हरीपाळ देवांच्या शरीरात प्रवेश केला. अवतार धारणाची ही घटना शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद शुक्ल द्वितीयेला रविवारी घडली.

         या घटनेनंतर श्रीचक्रधर स्वामिंचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच सुरू झाले. कालौघात त्यांना एक पुत्रही झाला. त्यांचे जुगाराचे व्यसन मात्र तसेच राहिले. एक दिवस द्यूतात हारल्यामुळे त्यांनी देणेकर्‍यांचे पैसे जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत अन्नप्राशन करणार नाही अशी शपथ घेतली. त्यांची पत्नी कमळाइसाने त्यांना या कारणासाठी दागिने देण्यास नकार दिला. शेवटी त्यांच्या वडिलांना देणेकर्‍यांचे पैसे परत करावे लागले.
या घटनेमुळे हरपाळदेव यांना औदासीन्याने ग्रासले. लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले. त्यांनी राजविलासी भोग, संसार-सुख यांचा त्याग करायचा निर्णय घेतला.

         गृहत्याग करण्यासाठी हरपाळदेवांनी रामयात्रेला रामटेक येथे जावयाचे आहे अशी सबब घरी सांगितली. त्यावेळी महाराष्ट्रातील यादव व भडोचचे राज्य यांच्यात कलह सुरू होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी या कल्पनेस विरोध केला. परंतु शेवटी हरीपाळदेवांनी वडिलांचे मन वळविले व त्यांच्या वडिलांनी त्यांना संरक्षणासाठी घोडेस्वार व सेवक यांच्यासह जाण्यास अनुमती दिली. त्यांना आपल्या सोबतचा लवाजमा नको होता. त्यांना सर्वस्वाचा त्याग करावयाचा होता. त्यामुळे त्यांनी एकेका मुक्कामा वरून आपले क्षेमकुशल कळविण्यासाठी एकेक सैनिक परत पाठवणे सुरू केले. शेवटी अमरावती जिल्ह्यातील देऊळवाडा येथे काजळेश्वराच्या मंदिरात मुक्कामास असतांना उरलेले शेवटचे दोन सैनिक निद्राधीन झाल्याचे पाहून आपली राजवस्त्रे तिथेच काढून ठेवून दोन वस्त्रांनिशी ते तिथून निघून गेले.

           तिसऱ्या दिवसी हरीपाळदेव रिद्धपूर येथे आले. तिथे त्यांना रांधवन हाटात श्री गोविंदप्रभु दिसले. गोविंदप्रभूं पासून हरीपाळदेव यांनी उभयशक्ती प्राप्त केल्या याच वेळी श्रीगोविंद प्रभूंनी त्यांना श्रीचक्रधर हे नाव दिले.

*▪एकाकी भटकंतीचा काळ :*
*~~~~~~~~~~~~~~~~~*
          श्री गोविंदप्रभूं पासून शक्ती स्विकार केल्या नंतर श्रीचक्रधर स्वामिंची विरक्ती अधिकच वाढू लागली. लीळाचरित्राच्या एकांक या भागात त्यांच्या या काळातील भ्रमंतीचे वर्णन आहे. या काळात त्यांनी महाराष्ट्रभर एकट्यानेच भटकंती केली. आंध्र प्रदेशाच्या काही भागातही त्यांनी भ्रमण केले. यावेळेपर्यंत श्रीचक्रधर स्वामिंना फारसा शिष्यपरिवार लाभला नव्हता. त्याकाळात श्रीचक्रधर प्रभुंचे वर्तन काहीसे विरक्ताप्रमाणे दिसून येते. एका प्रसंगी वरंगळ येथील एका घोड्याच्या व्यापार्‍याने आपल्या मुलीचे त्यांचेसोबत लग्नही लावून दिले. तिथे काही दिवस राहून ते परत गोंडवनातील आदिवासींच्या सहवासातही ते काही दिवस राहिले. या काळात श्रीचक्रधर स्वामिंना तुरळक शिष्य लाभले, त्यांपैकी वडनेरचे रामदेव दादोस हे प्रमुख होते. त्यांच्यामार्फतच पुढे आचार्य नागदेव, आबाइसा, महादाइसा, उमाइसा इत्यादि शिष्य परिवार मिळाला.

          भ्रमंतीच्या या काळात श्रीचक्रधर स्वामी यांची मेहकर येथे बाणेश्वराच्या मंदिरात बोणेबाईंची भेट झाली. बोणेबाईंना देवकी व स्वतः श्रीकृष्ण बनवून त्यांनी मेहकर येथे गोकुळाष्टमी साजरी केली. बोणेबाईं बरोबर त्यांनी लोणारची यात्राही केली. नंतर एके दिवशी सिंहस्थ यात्रेच्या निमित्ताने ते बोणेबाईं बरोबर त्र्यंबकेश्वरला जाण्यास निघाले. वाटेत पैठण येथे त्यांनी त्र्यंबकेश्वरास जाण्याचा बेत रद्द करून पैठण येथे बाइसांना प्रेमदान दिले. ही घटना शके ११८९ मध्ये घडली.

        अशा तर्‍हेने रिद्धीपुरापासून सुरू झालेले श्रीचक्रधर स्वामिंचे एकाकी भ्रमण पैठण इथे संपले. यानंतरच्या काळात त्यांनी प्रकटपणे समाज व धर्मसुधारणेचे कार्य सुरू केले.
एकाकी भ्रमणाच्या काळात श्री स्वामिंनी लोकजीवन प्रत्यक्ष पाहिले. त्या काळातील सामाजिक व धार्मिक परिस्थितीचे अवलोकन केले. त्यांच्या पुढील ज्ञानदानाच्या कार्याची पूर्वतयारीच या काळात झाली.

*~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..*
*🙏दंडवत प्रणाम..!!🙏*
*************************                  *ई.साधेराज दर्यापुरकर.रिद्धपुर*
*************************
🥀🍂🍂🥀🍂🍂🥀🍂🍂🥀

श्री चक्रधर स्वामीं चा पाळणा.. येथे क्लिक करा.

Thursday, 17 August 2017

वोडनझडपा गृही क्रिडा : ऋद्धपुर

💥💥💥💥💥💥💥💥
वोडनझडपा गृही क्रिडा : ऋद्धपुर
-----------------------------
स्थानाची माहिती :
         हे स्थान राजमठा पासुन विश्राम गृहाकडे जातांना जवळच रस्त्याच्या डाविकडे छोट्या मंदिरात आहे. त्या ठिकाणी राजदरबारचा शिपाई वोडनझडपा पत्नी सह राहत होता.
               🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸                     
लिळा:-
             ऋद्धपुर मधे जरी श्री गोविंद प्रभु दररोज क्रिडा करीत होते, तरी अद्याप ते वोडनझडपाच्या घरी कधी गेले नव्हते. कारण तो शिपाई पदावर होता, व स्वभावाने अतिशय ख्वाष्ट.
           एके दिवसी गोसावी क्रिडा करीत त्याच्या घरी गेले, सोबत माहीमभट्ट, व आचार्य होते. गोसावी घरात बीजे करतील म्हणून वोडनझडपाची पत्नी दारात उभी राहीली. आत मधे जाउ देइना. श्री प्रभु म्हणाले, “ आवो मेली जाए, परती होएना म्हणे : परती जाए : परती जाएना म्हणे : अवो मेली परती होएना म्हणे :” तरी ती परत फिरली नाही. मग गोसावी कोपु स्विकारला. आलोहीत वाम नेत्र उघडला : अधर कापु लागले, आणि म्हणाले, “ आवो मेली जाए तू परती म्हणे : ” व पाठीवर एक थाप मारुन तिला ढकलून दिले. ती रडत पडत दारातच उभी राहीली.
        गोसावी आत आले व उतरंडी उतरु लागले. दोन्ही हाता मधे धान्याची मडकी घेउन जोर जोराने श्वास घेत मधे आणून रिचवित. व रिकामी मडकी दारात नेउन फोडली. सिंक्यावरचे दही, दूधाची मडकी मधे आणून ठेवली. तिळ, तांदूळ, साळी, गुळ, गहु, उडीद, मुग, चणे, तुरी, राळे, चवळी, भादली, तुर डाळ, उडीद दाळ, चणा डाळ, वडे, पापड, सांडया, कुरडया, असे सर्व एकत्रित करुन त्या राशीवर आडासनी श्री चरण मधे घालुन  त्यावर बसले. भट, माहिमभट्ट ईवलीसी तोंडे करुन बघू लागले. भट्ट म्हणाले, “माहिमभटो आता काय करावे.? तो दुष्ट राजपुत आता येईल. त्याला काय उत्तर द्याव.”
        एव्हड्यात पैलाकडून वोडनझडपा येतांना बघीतला..!  भट्ट, माहिमभट्ट समोर गेले व म्हणाले, “ वोडनझडपे हो आज गोसावी तुमच्या गृही बीजे केले असे. ” तो म्हणाला बरे झाले, कधी नव्हे तर आज माझ्या घरी बीजे केले. दैव भाग्य माझ." तुमच्या स्त्री ला पाठीवर हाणले. ती गोसावियांना आत मधे येउ देत नव्हती म्हणून. तो म्हणाला, “ भली हाणीतली, राउळांना कां आत येउ देत नव्हती..? राउळ विणाकारण का मारतील..  भट म्हणाले, “तुमच्या उतरंडीचे मडके फोडीली. ”  तो म्हणाला, माझी खापराची फोडली तर, गोसावी मज तांबा, पितळेची देतील..”  भट म्हणाले, तुमचे सर्व धान्य  नासविले.” तो म्हणाला, “ राउळांनी माझे पाप नासले, मी कृत्याकृत्त झालो. मग तो घरा मधे आला.
          गोसावी घरातच होते. त्याला पाहीले व भय स्विकारले, व बाहेर निगू लागसे. मग तो म्हणाला, “जी जी आता पर्यंत गेले असता तर ठिक होत, आता कसे जाल”, व समोर आडवा पडला.
      मग भट, माहिमभट्ट म्हणाले, प्रभु विनंती स्विकारा यांची. श्रीप्रभुंनी विनंती मान्य केली. म्हणाले, “अवो मेला जाए, उठी उठी म्हणे :” मग तो उठला, बाज सुपवती घातली, त्यावर चादर अंथरली,  घर स्वच्छ केले. सडा समार्जन केले. रागोळ्या काढल्या. बाजारा मधुन कणिक, तांदूळ आणले, माहिमभटांनी उपहाराची तयारी केली. वोडनझडपाने गोसावियांना मर्दना मादने दिधले, नवीन वस्त्र ओळगविली. पुजावसर झाला. आरोगणा झाली. गुळूळा, विडा झाला. भटा, माहीमभटांची गोसावीयांचे दृष्टिसमोर जेवणे झाली. वोडनझडपा म्हणाला, “ जी: जी गावा वेगळा अपवित्र होता जी, अनाथ अपवित्र होता जी, आज पवित्र, सनाथ केला जी.”
       मग भट, माहिमभट्ट गोसावीयांसोबत मढात बिजे केले. ओडनझडपा मढापर्यंत बोळवित आला. त्या दिवसा पासुन गोसावी मधुन त्याचेकडे जात. तेंव्हा पासुन वोडनझडपाच्या घरात तांब्याची भांडी आली. जरी सोन्या चांदीची मागीतली असती तर सोन्याची झाली असती. (ऋ.च. उत्त.९०)        
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
साधेराज दर्यापुरकर@_रिद्धपुर.
दंडवत प्रणाम
..

Friday, 11 August 2017

पोवाडा - श्री चक्रधर स्वामींचे शिष्य निळभट्ट भांडारेकार

पोवाडा भाग - १

पोवाडा भाग - २

दण्डवत प्रणाम

परब्रम्ह परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी ८०० वर्षापूर्वी
अन्यथा ज्ञाना मधे भरकटलेल्या या सकल जन माणसांना यथार्थ ज्ञान देवून त्यांच्या जिवोध्दरना साठी पायी भ्रमण करत पूर्ण महाराष्ट्र पदस्पर्शाने पावन केला..
 याच काळात स्वामींच्या सहवासात एक शिष्य आले त्यांच नाव निळभट्ट भांडारेकार
फक्त अंगावरच्या कपड्यावर निघालेला हा गृहस्थ त्याच्या त्यागाची महती शाहीरांनी या पोवाड्या मधे केली आहे..

दोन भागात विभागणी केलेला हा पोवाडा आपल्या  सेवेत

भाग - १
https://youtu.be/auXIzf8y6ys

भाग - २
https://youtu.be/RDbKCmEfQio

वरील लिंक वर क्लिक करून आपण ऐकू शकता...



Wednesday, 2 August 2017

जेव्हा गुरुवर्य देवरक्षो म्हणतात



महादाइसी म्हणितले ,जी जी ,आम्ही तुम्हासी दंडवतेकरीत तर गोसावी कायी म्हणती जी ?
यावरी सर्वज्ञे म्हणितले ,बाई हे ऐसे म्हणे ,जे जीव सर्व दोषाचे आळे तर तया  सर्व दोषापासौनि चैतन्या पर परमेश्वर तो देवो तुम्हा रक्षी ऐसे म्हणती की बाई. यावरूनच देवरक्षो ऐसा शब्दे आशिर्वाद प्रचलीत झाला असावा असे वाटते.तसेच पुढील दंडवत करणार्या व्यक्तीस देवरक्षो या शब्दाने वासनीकास चार प्रकारचे आशीर्वाद घडतात.असे एका संशोधन कर्त्याने अर्थ लावला आहे.
जसे ,"दे+व+र+क्षो "यात 'दे'म्हणजे देतानी शत आयुष्यानी, शंभर वर्षाचे पूर्ण आयुष्यमान होवो ! 'व' म्हणजे म्हवंकारे वंशवृध्दीनाम् वंशाची वाढवृध्दी होवो ! 'र' म्हणजे रक्षन्ते सर्व पापानि -सर्व दोषांपासून रक्षण होवो ! 'क्ष' म्हणजे क्षालनम् भव नाशनम् -भवनाम् संसाराचे क्षालन होवो ! या प्रकारचे चार आशीर्वाद मिळतात. करिता वासनीकाने भिक्षुकास नम्रतापूर्वक दंडवत प्रणाम अवश्य करावा.थोर लाभ असे ! पुज्य मानावे .
सौजन्य - ई.श्री. भाईदेव बिडकर फलटण

प्रसादसेवा स्तोत्र.....On Youtube

Tuesday, 1 August 2017

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रविण भाऊ

आपल्या परीवारातील प्रविण पी.पी. नावाने ओळख आहे त्यांची.
सिल्वासा (दादरा नगर हवेली) येथे पोलीस मधे आहेत.
त्यांचा आज वाढदिवस..
पी.पी.. लाख लाख शुभेच्छा वाढदिवसाच्या..
💐💐💐💐💐💐