*नित्य व्यवस्थेचे मादने स्थान रिद्धपुर :*
🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠
हे स्थान राजमठा मागे सर्पदंष्ट महादाईसाचे विष उतरविणे स्थानाच्या बाजूलाच भिंतीलगत एका छोट्या मंदिरात आहे.
➖◾🔹◾➖
*येथील लीळा:*
*१.. स्नान प्रसंगी पाऊस थांबविणे :*
〰〰〰〰〰〰〰〰
एके दिवसी श्रीप्रभू स्नान करण्यास बसले असता अचानक पाऊस आला. श्रीप्रभू वर बघत श्रीकर आकाशाकडे करत म्हणाले, "आवो मेली जाए : राहे : राहे : ना म्हणे" अस म्हणताच पाऊस थांबला. मग स्नान झाले. (गो.प्र.च.२०९)
◾◾◾◾◾
*२.. सुर्याते वरता ये म्हणने :*
〰〰〰〰〰〰〰
एकदा श्रीप्रभूंना स्नान होत होते. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे खुप थंडी पडली होती. त्यावेळी सुर्याकडे बघून म्हणाले, "आवो मेली, वरती ये ना म्हणे :" आणि काय आश्चर्य... सुर्य वरती आला. (गो.प्र.च. २६६)
◾◾◾◾◾
*३.. म्हाइंभटांनी टाकलेले पाणी सांडणे :*
〰〰〰〰〰〰〰〰
श्रीप्रभूंच्या स्नानासाठी पाणी टाकण्याचा व्यापार त्रिपुरारी भटाकडे असायचा, पण त्या दिवसी म्हाइंभटांनी गंगाळ भरुण ठेवले. श्रीप्रभू स्नानासाठी आले व गंगाळातील पाणी बघून म्हणाले," हे ते नव्हे म्हणे: सांडी सांडी म्हणे: हे म्हाइंभटवणी होए म्हणे :" असे म्हणून ते पाणी सांडून दिले. मग त्रिपुरारी भटाने दुसरे गरम पाणी आणून गंगाळात टाके पर्यंत राउळ तसेच आसनस्थ होते. (गो.प्र.च.२७३)
◾◾◾◾◾
*४.. म्हाइंभटांनी धुतलेले जानवे सांडणे :*
〰〰〰〰〰〰〰〰
एकदा श्रीप्रभूंना मर्दना मादने झाले. तोपर्यंत म्हाइंभटांनी गोसावियांचे जानवे स्वच्छ धुुउन श्रीकरी ओळगविले, परंतु राउळांनी ते चिखलात फेकुन दिले. कारण ते काम त्रिपुरारी भटाचे होते. मग त्यांनी धुुउन दिल्यावर स्विकार केला. (गो.प्र.च.२७४)
◾◾◾◾◾
*५.. त्रिपुरारी भटाची सेवा स्विकार :*
〰〰〰〰〰〰〰
नेहमीप्रमाणे एकदा श्रीप्रभूंनी स्नानापूर्वी जानवे काढून चौरंगावर ठेवले. महेश्वरपंडित जानवे उचलून घासु लागले. त्यावेळी श्रीप्रभूंनी कोप स्विकार करत म्हणाले, "आवो मेला ! सांडी : सांडी : म्हणे : सांडी ना म्हणे :" मग महेश्वरपंडितांनी जानवे ठेवले, ते त्रिपुरारी भटांनी स्वच्छ धुतले व मग श्रीप्रभूंनी ते स्विकारले. कारण त्यांना त्रिपुरारीचीच सेवा हवी होती. (गो.प्र.च.२९९)
◾◾◾◾◾
*६.. पर्जन्य बोलावणे :*
〰〰〰〰
एकदा पाऊस न पडल्यामुळे त्यावर्षी दुष्काळ पडला होता. त्यामुळे लोक घाबरुन गेले. रिद्धपुरचे महाजनांनी भक्तिजनांना म्हटले की तुम्ही आपल्या राउळांना विनंती करा. त्याप्रमाणे प्रार्थना करीत आबाइसा म्हणाली, " जी, जी ! पाऊस न येण्याकारणे सर्व लोक भयभीत झाले आहेत. पाऊस यावा जी !" लगेच श्रीप्रभू ढगाकडे बघून म्हणाले, "आवो मेला जाए: ये ये ना म्हणे :" आणि काय आश्चर्य ! काळेकुट्ट ढगांनी आकाश भरुण आले. पर्जन्य वर्षाव सुरु झाला. सर्वत्र पाऊस झाला. सुकाळ झाला. (गो.प्र.च.२१४)
*🙏राउळ माए : राउळ बापु 🙏*
*🙏🙏 दंडवत प्रणाम 🙏🙏*
🔹➖🔹➖🔹➖🔹➖🔹➖🔹➖🔹➖
*सा.दर्यापुरकर__@ रिद्धपुर*
🔹➖🔹➖🔹➖🔹➖🔹➖🔹➖🔹➖