Saturday, 7 April 2018

रिध्दपूर | Riddhapur | Mahanubhav

                 
                       रुपनायका भेटी : ऋद्धपुर

        हे स्थान राजमठा शेजारी प.पु.प.म.श्री पाचराउत बाबा यांच्या मठामधे आहे.

                                      लिळा

             आमच्या सर्वज्ञांचे वास्तव्य जोगेश्वरी येथे असतांना, एके दिवसी साधेस म्हणाले, " साधेहो तुम्ही परमेश्वरपूर निघालात तर मामेयाचे घरी जेवाल की, भिक्षा कराल ?" साधे म्हणाल्या, " हां जी.. गोसावी मामांना कस काय ओळखतात..?" यावर सर्वज्ञांनी या लीळचीे गोष्ट सांगीतली.

             गोसावियांना दाभेरी येथे दर्भेश्वराच्या देवाळात बाळाणेयावर आसन होते. तेंव्हा रुपनायक आले. त्यांनी स्वामिंना पाहिले, समोर आले व दंडवत केले, श्रीचरणा लागले. रुपनायकांनी विनंती केली,  "जी जी.. गोसावी माझ्या आवारा बीजे करावे जी." गोसावियांनी विनंती मान्य केली. स्वामिंना घोड्यावर बसवून रुपनायक आपल्या आवारासी घेउन आले.

         ओलणी दिली, मग गोयावियांसी मर्दना मादने झाले. पुजा केली. तेंव्हा साधा म्हणाल्या, " हां जी ते पुजा करु केंवी जाणती..?" तेंव्हा सर्वज्ञ म्हणाले, "बाइ ! ते आगमीक : पुजा करु जाणती. मग गोसावियांना दुधा-तुपा सोबत आरोगणा झाली. गुळुळा विडा झाला. मग पहूडू झाला. मग सकाळी दाभेरीस बीजे केले. (ली.च पू.४०)
__________________________________
शब्दार्थ :  बाळाणे = कठडा/सज्जा. ओलणी = आंघोळीच्या वेळी नेसायचे वस्त्र. आगमीक = तंत्र जाणनारा.
__________________________________

सा.दर्यापुरकर....@ रिद्धपुर.

Wednesday, 4 April 2018

वाकी वेसीशी खेेेळ करणे स्थान: रिद्धपुर

वाकी वेसीशी खेेेळ करणे स्थान: रिद्धपुर
~-~-~-~-~-~-~-~-~-~-~-~-~-~-~

      हे स्थान सर्वतिर्थ मंदिराच्या मागे दोनशे मिटर अंतरावर आहे.
                            *****
लीळा :
            सकाळी पुजावसर झाल्यावर एखाद्या दिवसी श्रीप्रभू दुडु-दुडु धावत वाकी वेसी जवळ उभे राहत असत. ते लावलेले असेल तर त्यांची आगळ काढीत. आणि दरवाजा लोटीत तेंव्हा त्याचे चाक करा-करा वाजे. परत लोटीत, पुन्हा आवाज निघाल्यावर म्हणायचे, "आवो मेला जाए : बोबाते म्हणे :" म्हणून पुन्हा लोटल्यावर ते पुन्हा करा-करा वाजायचे, "आवो मेला जाए नको बोबावो म्हणे:" म्हणून दरवाज्याला श्रीचरणाने हाणीत आणि हास्य स्विकारीत.
वेसी वरील घोड्याशीही खेळ करीत. त्याच्या मानेवर थापटीत. मग बीजे करीत.
[गो.प्र.च.९८]
                          -^-^-^-^^-
सा. दर्यापुरकर ____________@__रिद्धपुर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Wednesday, 28 February 2018

होळीचे_स्थान:श्रीक्षेत्र ऋद्धपुर..


होळीचे_स्थान:श्रीक्षेत्र ऋद्धपुर

       रिद्धपुर मधिल हनुमंताच्या किंचित आग्नेयेस भिंतिला लागून हे स्थान आहे. [स्थान क्र.१४३]

हनुमंता पुढे होळी पेटायची, तेंव्हा श्रीगोविंदप्रभू या ठिकाणी खेळ क्रिडा करीत. सिमुगा शिंपने ही लीळा सुध्दा याच स्थानाची.
                         *****
#लीळा :
              रिद्धपुर मधे श्रीप्रभूं गोसावी प्रथम राज्य केले तेंव्हा, दरवर्षी सिमग्याच्या  [होळीचे] दिवसी बालमित्रांसह या ठिकाणी यायचे. राउळांना परशरामाकडे आल्यानंतर महाजनांनी घातलेल्या माच्यावर आसन झाल्यावर सिंपने होत असे.

              गोसावी राज्यधर्म स्विकारल्या नंतर, आबाइसा होळी पुनवेच्या दिवसी गोसावियांना मर्दना मादने झाल्यावर पुजावसर केला. कापुर कस्तुरीसह सर्वांगी चंदन ओळगविले. नविन कपड्यासह सर्व श्रुंगार केला. पाटाउवाची बरवी मालगंठी केली. पाडव्याच्या दिवसी सकाळी मुले महाद्वारासमोर आली. कवाडे घातलेली होती. मुले मोठ्याने बोंबलू लागली, "जी जी.. राउळो खेळावया बीजे करावे जी : राउळो ! दीवाळीए वाचे तो सिमगा नाचे ! आज वरीसादिसाचा सणु तरी खेळावया बीजे कीजो जी : !" मुलांची असी ओरड ऐकुन राउळांनाही खेळावयाची प्रवृत्ती उपजली. हर्ष स्विकारला : फुटा प्रावर्ण केला: तेंव्हा भट माहिमभट्टांना म्हणाले, " माहिमभटो कवाडे उघडा: गोसावियांसी खेळावयाची प्रवृत्ती असे:

         कवाडे उघगडल्यावर गोसावी बीजे केले. मुलांनी राउळांना पाहूूून, मोठ्याने ओरडले. अरे... राउळ आले रे ! गोसावी महाद्वाराच्या द्वारशंका धरुन उभे राहिले. मुलांनी टाळ्या वाजवत, अरे धुर धूर... म्हणून सिंपने सुरु झाले. चिकसा, चंदन सींपु लागले. गोसावी नावेक कवाडा आड दडती. ऐसा नावेक खेळ केला.

       मग खेळगड्यांसह हाटवटीए, बीदी, गोदरीए खेळ करीत होळीच्या स्थानाच्या ठिकाणी सिंपने झाले.   [रि.च. १७ ]

                   ****
सा.दर्यापुरकर.                    दंडवत प्रणाम
〰〰〰〰〰〰〰〰

Wednesday, 14 February 2018

श्री गोविंद प्रभू लिळा



*देवाळा ब्राह्मणाचे अन्न आरोगणा :*
🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠
*लीळा:*

      रिद्धपुर हे त्यावेळी मोठ पेठेच गांव. रिद्धपुर परगण्यातील खेड गांवच्या एका ब्राह्मणाची लेक रिद्धपुरला  दिलीे होती. एके दिवसी बाजारच्या दिवसी काही कामासाठी रिद्धपुरला जायच ठरलं. पत्निला म्हणाला, "राउळांनी रिद्धपुर मधे सगळीकडे कालवाकालव केली असेल तरी माझ्यासाठी  शिदोरी तयार कर. वाटेत कुठे तरी जेवन करुन मग रिद्धपुरला जाईल." म्हणून शिदोरी व दही-भात सोबत घेउन रिद्धपुरला निघाला.

          रिद्धपुरला देवाळा तळ्याजवळ आला, मनात म्हणाला, आता स्नान करू व मग जेवन कराव! पण राउळांनी पहिले तर ते अवघ भ्रष्टाभ्रष्ट करतील म्हणून तळ्याजवळ पश्चिमेला वैजनाथाच्या मंदिराजवळच्या पिंपळाला शिदोरीच गाठोड बांधुन ठेवल व तो स्नान करण्यास गेला.

          तेंव्हा गोसावी तेथे बिजे केले. व पिंपळाला बांधलेली शिदोरी सोडून तेथेच आरोगणा सुरु केली. ब्राह्मणाचे स्नान आटोपून मागील वास पहिला तर, श्रीप्रभू  आरोगणा करत असल्याच बघून त्याची कुमती हरली. सामोरा आला व दंडवत केले. म्हणाला, " राउळ ईश्वर पुरुष : माते पवित्र करावया येथ बिजे केले : माझे दैवभाग्य : राउळाविन काइ कवनी ठाव असे :" राउळ माए : राउळ बापु :" म्हणून श्रीचरणा लागला. सर्वज्ञे म्हणाले, " आवो मेला जाए : आता होए म्हणे :" मग गोसावी बीजे केले. नंतर ब्राह्मणाने तो उचिष्ट प्रसाद सेवन केला. (रि.च.पू.६४)

दंडवत प्रणाम..

🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠
*इ.साधेराज दर्यापुरकर __@रिद्धपुर.*
🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠

Friday, 9 February 2018

नित्य व्यवस्थेचे मादने स्थान रिद्धपुर

*नित्य व्यवस्थेचे मादने स्थान रिद्धपुर :*
🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠

हे स्थान राजमठा मागे सर्पदंष्ट महादाईसाचे विष उतरविणे स्थानाच्या बाजूलाच भिंतीलगत एका छोट्या मंदिरात आहे.

      ➖◾🔹◾➖

*येथील लीळा:*

*१.. स्नान प्रसंगी पाऊस थांबविणे :*
 〰〰〰〰〰〰〰〰
     एके दिवसी श्रीप्रभू स्नान करण्यास बसले असता अचानक पाऊस आला. श्रीप्रभू वर बघत श्रीकर आकाशाकडे करत म्हणाले, "आवो मेली जाए : राहे : राहे : ना म्हणे" अस म्हणताच पाऊस थांबला. मग स्नान झाले. (गो.प्र.च.२०९)

       ◾◾◾◾◾

*२.. सुर्याते वरता ये म्हणने :*
 〰〰〰〰〰〰〰

      एकदा श्रीप्रभूंना स्नान होत होते. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे खुप थंडी पडली होती. त्यावेळी सुर्याकडे बघून म्हणाले, "आवो मेली, वरती ये ना म्हणे :" आणि काय आश्चर्य... सुर्य वरती आला. (गो.प्र.च. २६६)

      ◾◾◾◾◾

*३.. म्हाइंभटांनी टाकलेले पाणी सांडणे :*
 〰〰〰〰〰〰〰〰

         श्रीप्रभूंच्या स्नानासाठी पाणी टाकण्याचा व्यापार त्रिपुरारी भटाकडे असायचा, पण त्या दिवसी म्हाइंभटांनी गंगाळ भरुण ठेवले. श्रीप्रभू स्नानासाठी आले व गंगाळातील पाणी बघून म्हणाले," हे ते नव्हे म्हणे: सांडी सांडी म्हणे: हे म्हाइंभटवणी होए म्हणे :" असे म्हणून ते पाणी सांडून दिले. मग त्रिपुरारी भटाने दुसरे गरम पाणी आणून गंगाळात टाके पर्यंत राउळ तसेच आसनस्थ होते. (गो.प्र.च.२७३)

       ◾◾◾◾◾

*४.. म्हाइंभटांनी धुतलेले जानवे सांडणे :*
 〰〰〰〰〰〰〰〰

        एकदा श्रीप्रभूंना मर्दना मादने झाले. तोपर्यंत म्हाइंभटांनी गोसावियांचे जानवे स्वच्छ धुुउन श्रीकरी ओळगविले, परंतु राउळांनी ते चिखलात फेकुन दिले. कारण ते काम त्रिपुरारी भटाचे होते. मग त्यांनी धुुउन दिल्यावर स्विकार केला. (गो.प्र.च.२७४)

      ◾◾◾◾◾

*५.. त्रिपुरारी भटाची सेवा स्विकार :*
 〰〰〰〰〰〰〰

      नेहमीप्रमाणे एकदा श्रीप्रभूंनी स्नानापूर्वी जानवे काढून चौरंगावर ठेवले. महेश्वरपंडित जानवे उचलून घासु लागले. त्यावेळी श्रीप्रभूंनी कोप स्विकार करत म्हणाले, "आवो मेला ! सांडी : सांडी : म्हणे : सांडी ना म्हणे :" मग महेश्वरपंडितांनी जानवे ठेवले, ते त्रिपुरारी भटांनी स्वच्छ धुतले व मग श्रीप्रभूंनी ते स्विकारले. कारण त्यांना त्रिपुरारीचीच सेवा हवी होती. (गो.प्र.च.२९९)

      ◾◾◾◾◾

*६.. पर्जन्य बोलावणे :*
          〰〰〰〰

      एकदा पाऊस न पडल्यामुळे त्यावर्षी दुष्काळ पडला होता. त्यामुळे लोक घाबरुन गेले. रिद्धपुरचे महाजनांनी भक्तिजनांना म्हटले की तुम्ही आपल्या राउळांना विनंती करा. त्याप्रमाणे प्रार्थना करीत आबाइसा म्हणाली, " जी, जी ! पाऊस न येण्याकारणे सर्व लोक भयभीत झाले आहेत. पाऊस यावा जी !" लगेच श्रीप्रभू ढगाकडे बघून म्हणाले, "आवो मेला जाए: ये ये ना म्हणे :" आणि काय आश्चर्य ! काळेकुट्ट ढगांनी आकाश भरुण आले. पर्जन्य वर्षाव सुरु झाला. सर्वत्र पाऊस झाला. सुकाळ झाला. (गो.प्र.च.२१४)

*🙏राउळ माए : राउळ बापु 🙏*
*🙏🙏 दंडवत प्रणाम 🙏🙏*
🔹➖🔹➖🔹➖🔹➖🔹➖🔹➖🔹➖
*सा.दर्यापुरकर__@ रिद्धपुर*
🔹➖🔹➖🔹➖🔹➖🔹➖🔹➖🔹➖

Wednesday, 31 January 2018

Jalicha Dev | जाळीचा देव

                   



*जाईच्यादेवाची जत्रा..*
  
      आम्ही तेंव्हा ५,६ वर्षाचे होतो, घरामधे आई वडीलांची  जा.देव यात्रा बद्दल झालेली बोलनी कानावर पडली की, दांडीपुनवेच्या दिवसाचे वेध लागायचे.

अखेर तो दिवस उजाडायचा.
आधल्या दिवसी सकाळीच निघून त्या वेळच्या खाजगी मोटारीने चिखली, बुलडाणा ते पाडळी पोचायचो (पुढे बस जात नव्हती)
तेथून बैलगाडी करुन (४आणे भाड आम्ही फ्री.) सायंकाळी जा.देव पोचायचो.
जत्रेतील ओळखीच्या दुकानामागे तो दुकानदार जागा करुन ठेवायचा.(reservation) सोबत नेलेल्या गोनपाटाला, सतरंजीला केल्या बघून निवारा तयार.😃
रात्री सोबतचे जेवन करुन मुक्काम. 

सकाळी वडील काड्या, गोवऱ्या जमा करुन आणीत किंवा आणा दोन आण्यात विकत आणीत. २ आण्याचा माठ [जो आज ५० रु.चा मिळतो]  ४ आण्याच डबाभर पाणी घेउन स्वयंपाक सुरु व्हायचा. वरण, भात, भाजी व रोडगे. मग उपहार, विडा घेउन देवाला जायचं. देवदर्शन उपहार विडा करुन परत ठिकाऩावर येउन जेवन व नंतर जत्रा.
त्या दिवसी मुक्काम करुन सकाळी  आलो तसेच परत..
ते दिवस आजही आठवतात.
नंतरही गेलो, नेहमी जातो पण ते नाही लक्षात राहीलं..

दंडवत प्रणाम..🙏🙏

साभार - साधेराज दादा दर्यापुरकर

Tuesday, 14 November 2017

रिध्दपुर महात्म्य...




                          रिद्धपुर महात्म्य 
                          """""""""""""""""""""

रिध्दपुरी नांदे प्रभू अवतार भजन तथा रिध्दपुर स्थानदर्शन पाहण्यासाठी येथे टच करा..

                     

          महानुभावांच्या सात काव्यापैकी रिद्धपुर वर्णन नावाचे एक महाकाव्य आहे. याच काव्याच्या पार्श्वभूमीवर आधारभूत मयंकराज शिष्य कवी डिंभ कृष्णमुनी यांनी रिद्धपुरचे महात्म्य सांगणारा रिद्धपुर महात्म्य  नावाचा ग्रंथ लिहिला. महात्म्य या शब्दावरुनच रिद्धपुरचे श्रेष्ठत्व आणि महानत्व याची कल्पना येते.
           या ठिकाणी रिद्धपुर महात्म्यातिल काही रोचक असा भाग सादर करीत आहे. पंडीत भिष्माचार्यांच्या आदेशावरुन कवी डिंभ यांनी भिष्माचार्यकृत सिद्धयामळ या संस्कृत ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला आहे़.

भिष्माचार्य म्हणे कवी डिंभा कृष्णमुनी ।
तेथे रिद्धपुर महात्म्य असे संस्कृतवाणी ।
तयाची मराठी भाषा करुणी ।
कथा निर्मावी तुवा ।।

तेंव्हा कवी डिंभ म्हणतात....

तयाची ये आज्ञेकिरीता । आरंभ केला ग्रंथा ।
तो आईकावा श्रोता आदरेसी ।

अशा प्रकारची सुचना श्रोत्यांना करुन कवी डिंभ आपल्या ग्रंथात परमेश्वरपुराचा महिमा वर्णन करीत आहे.

           * * * * * *
सांगता रिद्धपुर महात्म्य कथा ।
तिन आख्यान असे सर्वथा ।
नृसिंह ब्रह्महत्येपासोनि तत्वता ।
मुक्त झाला रिद्धपुरी ।।१४३।।

आनी रुचीक कथा श्रेष्ठा ।
दत्तात्रेय देवे केली रेणुकेंची प्रतिष्ठा ।
ऐसी तीन आख्याने निष्टा ।
असेती तेथे ।।४४।।

कळंयुगी अवतरौणीक भगवंते ।
द्वारका दाखविली लक्ष्मींदर द्विजाते ।
म्हणौनि द्वारावती रिद्धपुराते ।
म्हणिजे जाणा ।।१४९।।

रिद्धपुरा प्रयाण करता ।
तुज महिमा सांगैन असिता ।
सहस्र यज्ञाचे फळ तत्वता ।
लाभे  येकेके  पाउली ।।१५०।।

जे उत्तम मतीचे जन ।
रिद्धपुरा करती गमन ।
ते सतकोटी कुळासहित जान ।
पावती अच्यूतपद ।।१५१।।
जे रिद्धपुरा जावों म्हणती ।
ऐसी जयाची मनोवृती ।
तयाची पापे विलया जाती ।
जन्मोजन्मीची ।।१५२।।

जे रिद्धपुरा प्राणी जाती ।
श्रीप्रभू सन्निधानी मृत्ये  पावती ।
तया नाही पुनरावृत्ती ।
कल्पकाळवेऱ्हीं ।।१५३।।

जवे पर्यंत रिद्धपुरासी ।
गमन न कीजे पुरुषी ।
तवे पर्यंत पापाचिया रासी ।
न वचेती तयाचिया ।।१५४।।

अनंता पुण्यसंख्या तिर्थाचीया ।
दानाध्ययेन येज्ञाचिया ।
ब्रह्मेनि पुर्वी वीहिलिया जीया ।
तोया होती येके रिद्धपुरे ।।१५५।।

तप शौच्य दानाध्ययेन ।
वृताचे कैसे कारण ।
रिद्धपुरा केल्या गमण ।
त्याचा आत्मा शुद्ध होये ।।१५६।।

वाराणसी नर्मदादी कुरुक्षेत्रे ।
इत्यादी तिर्थे सर्वत्र केलीया ।
जे फळ होती निमिश मात्रे ।
जे जोडती रिद्धपुरी ।।१५७।।

तवेपर्यंत कासी आवंती मायानगरी ।
तीर्थेतीर्थपणे वाखानाति पृथिववरी।
जवे नाही देखिली रिद्धपुरी ।
सर्व पापनाशनी ।।१५८।।

जो बुद्धी धरुणि मानसी ।
नमस्कारी  रिद्धपुरासी ।
तेने मातेचिये प्रसन्न-वेदनेसी ।
नसिले सत्ये ।।१५९।।

जो घरी असौनि मानसी ।
नित्ये चींती रिद्धपुरा जावयाची ।
कींचीत पाप न बधी तयासी ।
म्हणे रुषीराज ।।१६०।।

परमेश्वरपुर  देखिलेयी दृष्टी ।
छत्र स्वपादुका परित्यजोनि राजश्रेष्ठी ।
साष्टांग घालीजे भुतटी ।
तरी होये पापाक्षेयो ।।१६१।।
सहस्र जन्मांतरे कासी स्थळ ।
सेविलीया जे  होये पुन्यफळ ।
ते रिद्धपुर सेविता केवळ ।
होये पाचा  दिवसा  ।।१६२।।

परमेश्वरपुरी जरी ।
स्वएंव वास करी ।
तो गति पांवे नीर्धारी ।
कुळी योगीयांचा ।।१६३।।

जावया रिद्धपुराप्रती ।
जे जन वासना धरची ।
ते नरकापासौनि मुक्त होती ।
पीतरासहीत ।।१६४।।

जो रिद्धपुरासी जाये ।
पदोपदी अश्वमेघ फळ लाहे ।
जो आनिका पाठवी तयासी होये ।
अच्युतपद ।।१६५।।

शत  येक चंद्रग्रहणी ।
शोमनाथी फळ लाहिजे जनी ।
ते फळ होय प्रतिदिनी ।
सेविलीया रिद्धपुरा ।।१६६।।

सहस्रवार कृष्णपक्षीचे ।
व्रतयुक्त केलया फळ तयांचे ।
ते येके दीवसें लाहिजे साचें ।
रिद्दीपुर स्थाने ।।१६७।।

पुष्कर तीर्थी कोटी कार्तिकी ।
केलिया जे फळ लाहिजे लोकी ।
ते रिद्धपुर केलया येकी ।
लाहिजे सीघ्र ।।१६८।।

शुक्लपक्षी चैत्रमासी ।
जो रिद्धपुरा जाये चतुर्दशी ।
ब्रह्मपद होये तयासी ।
संसयो नाही ।।१६९।।

रिद्धपुरा यात्रेसी ।
जो भोजन दे ज्ञातृभीक्षुसी ।
संसार - यातना तयासी ।
बाधुं न शके ।।१७०।।

हे रिद्धपुर महात्म्य प्रतक्ष ।
मनन केलिया पाविजे मोक्ष ।
वाचिता लाहिजे सीक्ष ।
परज्ञानाचा ।।१७१।।

हे अज्ञाना पुरुषासी ।
असत्य वाटे मानसी ।
जैसे गर्भावळे पदार्थासी ।
न दे कदा ।।१७२।।

वस्ति केलिया तिये रिद्धपुर स्थानी ।
नृसिंह मुक्त झाला पापापासौनी ।
यैसे नीरोपीता जाला शुळपानी ।
गौतमाप्रती ।।१७३।।

नृसिंहे जेथे केली वस्ती ।
तेथे नृसिंहमठ केला नीगुती ।
तयासी राजमठ म्हणती ।
कळयुगी मुनीजन ।।२३७।।

आठा दीशा अष्टजैया ।
येउनी सीमांतरी राहिलीया ।
समंधसुख लाहावया ।
श्रीप्रभूंचे ।।२५०।।

ब्रह्मेनी  नीरुपीले नृसिंहाप्रती ।
तुवा रिध्दपुरा करावी वस्ती ।
जवे अवतरे कैवल्यपती ।
कळयुगी ।।२५१।।

भस्मापुराचेया भयापासुनी ।
नारायेणे मज मुक्त केले वंकतीर्थस्थानी ।
तैसा नृसिंह रिद्धिपुर पाटनी ।
श्रीप्रभूने मुक्त केला ।।२५७।।

ऐसे रिद्धिपुर पवित्र रम्ये तीर्थ ।
अज्ञान जन वास करिती तेथे ।
ते स्वर्गात पावती निभ्रांत ।
संशयो नाही ।।२५८।।

मां जे का ब्रह्मज्ञानी असती ।
रिद्धपुर नमस्करुणी श्रीप्रभूतें चिंतीती ।
ते कैवल्यपद पावती।
नवल गाढे ।।२५९।।

म्हणौनि याचेनि दर्शनी ।
नृसिंहे रिध्दपुरे वस्ती केली असे ।
आछादन रुपे पाषाण वेशे।
सकळ देवांसहित ।।२७०।।
 
तेथे परमेश्वर अवतरैल ।
आनचचिया प्रतिमासी खेळ करैल ।
तेने आम्हा आवंदानुभव होईल ।
जो नाही आमच्या स्वरुपी ।

ऐसे कल्पुनि अंतरी ।
सकळ देव असती रिध्दपुरी ।
कळयुगी सुखशांति पावावया सुंदरी ।
असे रिद्धपुर ।।२७२।।

अवतारोणि तियाचे उदरी ।
श्रीगुंडमनाम स्विकरी ।
जन्मकाळी सुरवरी ।
केला पुृ्ष्पर्शावो ।।६००।।

वृतबंध जालेयावरी ।
वास्तव्ये केले रिद्धपुरी ।
बाळक्रिडा पकोपरी ।
खेळता जाला ।।६०१।।

जया कृमीवरि श्रीचरण ठेवी ।
तयासि नेउनी ब्रह्मपदी बैसवी ।
मेली प्रेते जीववी ।
श्री प्रभु तो ।।६०२।।

तया रिद्धिपुराचिया महिमाना ।
न वर्णवे रुषी सुरगणा ।
शेषा वर्णिता रसना ।
जालिया दोन भाग ।।७०५।।

यैसे रिद्धिपुर महात्म्य कथा ।
देवल म्हणे रुषिनाथा ।
महेष जाला सांगता ।
गौतमाप्रती ।।७०६।।

ऐसा देवला असिताचा संवाद ।
रिद्धिपुर महात्म्य कथेचा अनुवाद ।
तो करुणिया विशद ।
सांगितला तूज ।।७११।।

कथा संपूर्ण जाली येथौनि ।
कवी मुनिजना विनवी कर जोडौनी ।
अन्य कथनाची खंति मनी ।
काहि न धरावी ।।७१२।।

मज अस्तीपरीचा आचार नाही ।
भजन पुजन द्रव्य न जोडे कांही ।
म्हणौनि नामस्मरण करी पाही ।।
ग्रंथरचनामीशे ।।७१३।।

हे रिद्धिपुर महात्म्य श्रवण केलिया ।
परलाभ जोडे श्रोतया ।
श्रीप्रभूचरणा चरणार्विदी मुनि कृष्णया ।
लीन सर्व काळी ।।७१४।।

      ❇❇❇❇❇

अशा प्रकारे कवि डिंभ यांनी श्रीक्षेत्र रिध्दपुरचे महत्व अगदी साध्या व सोप्या भाषेत वर्णन केले आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏