Tuesday, 14 November 2017

रिध्दपुर महात्म्य...




                          रिद्धपुर महात्म्य 
                          """""""""""""""""""""

रिध्दपुरी नांदे प्रभू अवतार भजन तथा रिध्दपुर स्थानदर्शन पाहण्यासाठी येथे टच करा..

                     

          महानुभावांच्या सात काव्यापैकी रिद्धपुर वर्णन नावाचे एक महाकाव्य आहे. याच काव्याच्या पार्श्वभूमीवर आधारभूत मयंकराज शिष्य कवी डिंभ कृष्णमुनी यांनी रिद्धपुरचे महात्म्य सांगणारा रिद्धपुर महात्म्य  नावाचा ग्रंथ लिहिला. महात्म्य या शब्दावरुनच रिद्धपुरचे श्रेष्ठत्व आणि महानत्व याची कल्पना येते.
           या ठिकाणी रिद्धपुर महात्म्यातिल काही रोचक असा भाग सादर करीत आहे. पंडीत भिष्माचार्यांच्या आदेशावरुन कवी डिंभ यांनी भिष्माचार्यकृत सिद्धयामळ या संस्कृत ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला आहे़.

भिष्माचार्य म्हणे कवी डिंभा कृष्णमुनी ।
तेथे रिद्धपुर महात्म्य असे संस्कृतवाणी ।
तयाची मराठी भाषा करुणी ।
कथा निर्मावी तुवा ।।

तेंव्हा कवी डिंभ म्हणतात....

तयाची ये आज्ञेकिरीता । आरंभ केला ग्रंथा ।
तो आईकावा श्रोता आदरेसी ।

अशा प्रकारची सुचना श्रोत्यांना करुन कवी डिंभ आपल्या ग्रंथात परमेश्वरपुराचा महिमा वर्णन करीत आहे.

           * * * * * *
सांगता रिद्धपुर महात्म्य कथा ।
तिन आख्यान असे सर्वथा ।
नृसिंह ब्रह्महत्येपासोनि तत्वता ।
मुक्त झाला रिद्धपुरी ।।१४३।।

आनी रुचीक कथा श्रेष्ठा ।
दत्तात्रेय देवे केली रेणुकेंची प्रतिष्ठा ।
ऐसी तीन आख्याने निष्टा ।
असेती तेथे ।।४४।।

कळंयुगी अवतरौणीक भगवंते ।
द्वारका दाखविली लक्ष्मींदर द्विजाते ।
म्हणौनि द्वारावती रिद्धपुराते ।
म्हणिजे जाणा ।।१४९।।

रिद्धपुरा प्रयाण करता ।
तुज महिमा सांगैन असिता ।
सहस्र यज्ञाचे फळ तत्वता ।
लाभे  येकेके  पाउली ।।१५०।।

जे उत्तम मतीचे जन ।
रिद्धपुरा करती गमन ।
ते सतकोटी कुळासहित जान ।
पावती अच्यूतपद ।।१५१।।
जे रिद्धपुरा जावों म्हणती ।
ऐसी जयाची मनोवृती ।
तयाची पापे विलया जाती ।
जन्मोजन्मीची ।।१५२।।

जे रिद्धपुरा प्राणी जाती ।
श्रीप्रभू सन्निधानी मृत्ये  पावती ।
तया नाही पुनरावृत्ती ।
कल्पकाळवेऱ्हीं ।।१५३।।

जवे पर्यंत रिद्धपुरासी ।
गमन न कीजे पुरुषी ।
तवे पर्यंत पापाचिया रासी ।
न वचेती तयाचिया ।।१५४।।

अनंता पुण्यसंख्या तिर्थाचीया ।
दानाध्ययेन येज्ञाचिया ।
ब्रह्मेनि पुर्वी वीहिलिया जीया ।
तोया होती येके रिद्धपुरे ।।१५५।।

तप शौच्य दानाध्ययेन ।
वृताचे कैसे कारण ।
रिद्धपुरा केल्या गमण ।
त्याचा आत्मा शुद्ध होये ।।१५६।।

वाराणसी नर्मदादी कुरुक्षेत्रे ।
इत्यादी तिर्थे सर्वत्र केलीया ।
जे फळ होती निमिश मात्रे ।
जे जोडती रिद्धपुरी ।।१५७।।

तवेपर्यंत कासी आवंती मायानगरी ।
तीर्थेतीर्थपणे वाखानाति पृथिववरी।
जवे नाही देखिली रिद्धपुरी ।
सर्व पापनाशनी ।।१५८।।

जो बुद्धी धरुणि मानसी ।
नमस्कारी  रिद्धपुरासी ।
तेने मातेचिये प्रसन्न-वेदनेसी ।
नसिले सत्ये ।।१५९।।

जो घरी असौनि मानसी ।
नित्ये चींती रिद्धपुरा जावयाची ।
कींचीत पाप न बधी तयासी ।
म्हणे रुषीराज ।।१६०।।

परमेश्वरपुर  देखिलेयी दृष्टी ।
छत्र स्वपादुका परित्यजोनि राजश्रेष्ठी ।
साष्टांग घालीजे भुतटी ।
तरी होये पापाक्षेयो ।।१६१।।
सहस्र जन्मांतरे कासी स्थळ ।
सेविलीया जे  होये पुन्यफळ ।
ते रिद्धपुर सेविता केवळ ।
होये पाचा  दिवसा  ।।१६२।।

परमेश्वरपुरी जरी ।
स्वएंव वास करी ।
तो गति पांवे नीर्धारी ।
कुळी योगीयांचा ।।१६३।।

जावया रिद्धपुराप्रती ।
जे जन वासना धरची ।
ते नरकापासौनि मुक्त होती ।
पीतरासहीत ।।१६४।।

जो रिद्धपुरासी जाये ।
पदोपदी अश्वमेघ फळ लाहे ।
जो आनिका पाठवी तयासी होये ।
अच्युतपद ।।१६५।।

शत  येक चंद्रग्रहणी ।
शोमनाथी फळ लाहिजे जनी ।
ते फळ होय प्रतिदिनी ।
सेविलीया रिद्धपुरा ।।१६६।।

सहस्रवार कृष्णपक्षीचे ।
व्रतयुक्त केलया फळ तयांचे ।
ते येके दीवसें लाहिजे साचें ।
रिद्दीपुर स्थाने ।।१६७।।

पुष्कर तीर्थी कोटी कार्तिकी ।
केलिया जे फळ लाहिजे लोकी ।
ते रिद्धपुर केलया येकी ।
लाहिजे सीघ्र ।।१६८।।

शुक्लपक्षी चैत्रमासी ।
जो रिद्धपुरा जाये चतुर्दशी ।
ब्रह्मपद होये तयासी ।
संसयो नाही ।।१६९।।

रिद्धपुरा यात्रेसी ।
जो भोजन दे ज्ञातृभीक्षुसी ।
संसार - यातना तयासी ।
बाधुं न शके ।।१७०।।

हे रिद्धपुर महात्म्य प्रतक्ष ।
मनन केलिया पाविजे मोक्ष ।
वाचिता लाहिजे सीक्ष ।
परज्ञानाचा ।।१७१।।

हे अज्ञाना पुरुषासी ।
असत्य वाटे मानसी ।
जैसे गर्भावळे पदार्थासी ।
न दे कदा ।।१७२।।

वस्ति केलिया तिये रिद्धपुर स्थानी ।
नृसिंह मुक्त झाला पापापासौनी ।
यैसे नीरोपीता जाला शुळपानी ।
गौतमाप्रती ।।१७३।।

नृसिंहे जेथे केली वस्ती ।
तेथे नृसिंहमठ केला नीगुती ।
तयासी राजमठ म्हणती ।
कळयुगी मुनीजन ।।२३७।।

आठा दीशा अष्टजैया ।
येउनी सीमांतरी राहिलीया ।
समंधसुख लाहावया ।
श्रीप्रभूंचे ।।२५०।।

ब्रह्मेनी  नीरुपीले नृसिंहाप्रती ।
तुवा रिध्दपुरा करावी वस्ती ।
जवे अवतरे कैवल्यपती ।
कळयुगी ।।२५१।।

भस्मापुराचेया भयापासुनी ।
नारायेणे मज मुक्त केले वंकतीर्थस्थानी ।
तैसा नृसिंह रिद्धिपुर पाटनी ।
श्रीप्रभूने मुक्त केला ।।२५७।।

ऐसे रिद्धिपुर पवित्र रम्ये तीर्थ ।
अज्ञान जन वास करिती तेथे ।
ते स्वर्गात पावती निभ्रांत ।
संशयो नाही ।।२५८।।

मां जे का ब्रह्मज्ञानी असती ।
रिद्धपुर नमस्करुणी श्रीप्रभूतें चिंतीती ।
ते कैवल्यपद पावती।
नवल गाढे ।।२५९।।

म्हणौनि याचेनि दर्शनी ।
नृसिंहे रिध्दपुरे वस्ती केली असे ।
आछादन रुपे पाषाण वेशे।
सकळ देवांसहित ।।२७०।।
 
तेथे परमेश्वर अवतरैल ।
आनचचिया प्रतिमासी खेळ करैल ।
तेने आम्हा आवंदानुभव होईल ।
जो नाही आमच्या स्वरुपी ।

ऐसे कल्पुनि अंतरी ।
सकळ देव असती रिध्दपुरी ।
कळयुगी सुखशांति पावावया सुंदरी ।
असे रिद्धपुर ।।२७२।।

अवतारोणि तियाचे उदरी ।
श्रीगुंडमनाम स्विकरी ।
जन्मकाळी सुरवरी ।
केला पुृ्ष्पर्शावो ।।६००।।

वृतबंध जालेयावरी ।
वास्तव्ये केले रिद्धपुरी ।
बाळक्रिडा पकोपरी ।
खेळता जाला ।।६०१।।

जया कृमीवरि श्रीचरण ठेवी ।
तयासि नेउनी ब्रह्मपदी बैसवी ।
मेली प्रेते जीववी ।
श्री प्रभु तो ।।६०२।।

तया रिद्धिपुराचिया महिमाना ।
न वर्णवे रुषी सुरगणा ।
शेषा वर्णिता रसना ।
जालिया दोन भाग ।।७०५।।

यैसे रिद्धिपुर महात्म्य कथा ।
देवल म्हणे रुषिनाथा ।
महेष जाला सांगता ।
गौतमाप्रती ।।७०६।।

ऐसा देवला असिताचा संवाद ।
रिद्धिपुर महात्म्य कथेचा अनुवाद ।
तो करुणिया विशद ।
सांगितला तूज ।।७११।।

कथा संपूर्ण जाली येथौनि ।
कवी मुनिजना विनवी कर जोडौनी ।
अन्य कथनाची खंति मनी ।
काहि न धरावी ।।७१२।।

मज अस्तीपरीचा आचार नाही ।
भजन पुजन द्रव्य न जोडे कांही ।
म्हणौनि नामस्मरण करी पाही ।।
ग्रंथरचनामीशे ।।७१३।।

हे रिद्धिपुर महात्म्य श्रवण केलिया ।
परलाभ जोडे श्रोतया ।
श्रीप्रभूचरणा चरणार्विदी मुनि कृष्णया ।
लीन सर्व काळी ।।७१४।।

      ❇❇❇❇❇

अशा प्रकारे कवि डिंभ यांनी श्रीक्षेत्र रिध्दपुरचे महत्व अगदी साध्या व सोप्या भाषेत वर्णन केले आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Wednesday, 8 November 2017

श्री चक्रधर स्वामींची लिळा - डोडविहीरां [डोढ्रा जि. बुलडाणा] राघवदेवा भेटी

डोडविहीरां [डोढ्रा जि. बुलडाणा] राघवदेवा भेटी:
~~~~~~~~~~~~~~

लीळा :

           पूर्वि राघवभट्टांना भोगनारायणी गोसावियांची भेट झाली होती. परिभ्रमणाच्या पुर्वार्धात आमचे सर्वज्ञ शेंदुर्जनहून डोढ्रा येथे आले. गावाच्या उत्तरेस असलेल्या पिंपळाखाली खडक होता येथे आसन झाले. [ छायाचित्रातील मंदिराच्या ठिकाणी ] राघवभट्टांना तेंव्हा हे काल तेंव्हा त्यांना महाउत्सव केला. घरोघरी सडासामार्जन केले, दारासमोर रांगोळी काढल्या, गुढ्यातोरणे उभारली, पुजा सामुग्री व नानाविध पुजाद्रव्य घेउन वाजतगाजत, नाचतच गोसावियांना सामोरा आला. दंडवत घातले. पुजावसर झाला. स्वामिंना म्हणाले, "गोमटदेवहो या लेकराच्या आवारासी बीजे करावेजी."


       स्वामिंना होकार देताच राघवभट्टांचा हर्ष गगणात मावेना त्या आनंदाच्या भरात ते गायण करीत, नाचत  बागडत आवाराकडे निघाले. लोक विचारीत राघवदेवहो हे कोण ? गात, नाचत म्हणाले, " हे गोमटदेव बा: हे गोमटदेव बा :" अशा प्रकारे गोसावियांना आपल्या घरी आणला. त्यांची दोन आवार होते. त्यातील देव्हारचौकी स्वामिंना आसन झाले. मर्दना मादने झाले. गोसावियांच्या सर्वांगी चंदनाची पिंजरी लावली. पुजावसर झाला.  सहपरिवार गोसावियांना आरोगणा झाली. विडा ओळगविला. येथे वसती झाला. दुसऱ्या दिवसी सुद्धा राघवदेवाच्या आग्रहावरुन स्वामी थांबले. मग तिसऱ्या दिवसी निघाले. बाइसांनी विचारले बाबा हे कोण ? तेंव्हा स्वमिंनी सांगीतल की हे दुंडीराउळांचे अनुग्रहीत.! ( लीळा चरित्र पूर्वार्ध )

                  ####

     आज कार्तिक कृष्ण पंचमी. डोढ्रा येथील स्थानाचा पदस्पर्श पावन दिन.या स्थानापतीस दंडवत प्रणाम..!
                                        सा.दर्यापुरकर.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Thursday, 2 November 2017

राऊळ माय राऊळ बाप

❕❕राऊळ माय झाले ❕❕

मी काय काय सांगू
राऊळ काय झाले ।
राऊळ बाप झाले
राऊळ माय झाले ।।

आमृत्य ब्रह्मचारी
धन मान लोभ नाही
ही पांगळी व्यवस्था
राऊळ पाय झाले ।।

निच फास घेत होता
उच घास सोनियाचा
दलितास राखले हो
राऊळ साय झाले ।।

जातीत वाटलेले
येथेच एकवटले
एकात्मता दुधाची
राऊळ गाय झाले ।।

बांधू नका स्त्रियांना
त्या तर सुगंध आहे
स्वातंत्र्यगीत त्यांचे
राऊळ हाय झाले ।।

शोषित वंचितांचा
पहिलाच पाठराखा
अन्याय तेथ माझे
राऊळ न्याय झाले ।।

                          ➖मोहन बाभूळगावकर

➖➖➖➖➖➖➖➖➖

Wednesday, 1 November 2017

श्रीक्षेत्र मिरी....

मिरी : ता . पाथर्डी जिल्हा. अहमदनगर.
“”“”“”“”“”“”“”“”“”“”“”“”“”“”“”“”“

मिरी हे गांव शेवगाव ते पांढरीचा पुल या मार्गावर, शेवगावहून २९ किलोमीटर तसेच पांढरी पुला पासुन १४ कि.मि. अंतरावर आहे.
.........
अवस्थान स्थान :

परीभ्रमणाच्या उत्तरार्धात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी रांजनगावहून मिरीला आले. त्यावेळी येथे महालक्ष्मी चे देउळ होते. त्या देवळाच्चा चौकातील हे स्थान. स्वामिंचे या ठिकाणी विस दिवस वास्तव्य होते. रामदेव उपाख्य दादोस दररोज स्वामिंना या ठिकाणी
उपहार करीत. [उ. लीळा २५७]

एके दिवसी भट्टोबासांच्या विनंती वरुन स्वामिंनी त्यांना अटन विधिचे निरोपण केले.
[उ.ली.२५८]

वीस दिवसाच्या वास्तव्या नंतर सर्वज्ञ येथून लोहसर खांडगावला गेले.
                                                                                                                         
                                     .........

दंडवत प्रणाम !                                                           सा. दर्यापुरकर